पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र सरकारकडून ५० लाखांची मदत; शिक्षण आणि नोकरीसाठी तरतूद
पहलगाम हल्ल्यात संपूर्ण देशभरातून २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये ६ महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता. या सहा जणांच्या कुटुंबियांसाठी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या
नातेवाईकांना ५० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच, या कुटुंबातील
सदस्यांच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी राज्य सरकार घेणार आहे. जगदाळे
कुटुंबातील मुलीला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.