Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमोल मुझुमदार यांच्यावर महाराष्ट्र सरकारचाही अन्याय, खेळाडूंना २.२५ कोटी पण विश्वविजयाच्या शिल्पकाराला किती दिले, पाहा...

अमोल मुझुमदार यांच्यावर महाराष्ट्र सरकारचाही अन्याय, खेळाडूंना २.२५ कोटी पण विश्वविजयाच्या शिल्पकाराला किती दिले, पाहा...


मुंबई : अमोल मुझुमदार यांच्यावर एक खेळाडू म्हणून तर अन्याय झालाच, पण आता तर ते भारताच्या विश्वविजयाचे शिल्पकार ठरले. पण त्यानंतरही अमोल मुझुमदार यांच्यावर महाराष्ट्राच्या सरकारने रोख पारितोषिक देताना अन्याय केला असल्याचे म्हटले जात आहे. अमोल मुझुमदार हे गेल्या दोन वर्षांपासून भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे प्रशिक्षक आहेत. 

भारतीय संघाला वर्ल्ड कपचे स्वप्न हे अमोल मुझुमदार यांनी दाखवले आणि खेळाडूंनी ते प्रत्यक्षात उतरवले. खेळाडू हे महत्वाचेच असतात. पण ते त्यांची वैयक्तिक कामगिरी करत संघाच्या विजयात हातभार लावत असतात. पण प्रशिक्षकांना तर प्रत्येक खेळाडूचा वेगवेगळा विचार करावा लागतो आणि त्यानुसार प्रत्येक खेळाडूला वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात. त्यामुळे एका बाजूने पाहिले तर खेळाडूंपेक्षा प्रशिक्षकांचा विजयात मोठा वाटा असतो. पण हे असे असले तरी महाराष्ट्र सरकारने जेव्हा रोख पारितोषिक दिले, तेव्हा अमोल मुझुमदार यांच्यावर अन्याय केल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्राच्या सरकारने तीन खेळाडूंसह अमोल मुझुमदार यांचा सत्कार केला. यामध्ये भारताची उप कर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज आणि राधा यादव यांचा समावेश होता. महाराष्ट्र सरकारने या तिघींना २.२५ कोटी रुपये दिले आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. पण रोख पारितोषिक देताना महाराष्ट्राच्या सरकारने अमोल मुझुमदार यांच्यावर अन्याय केला आहे. कारण महाराष्ट्राच्या सरकारने अमोल मुझुमदार यांना २२.५० लाख रुपये दिले असल्याचे आता समोर येत आहे. अमोल मुझुमदार यांनी तर भारताच्या संपूर्ण संघाला मार्गदर्शन केले, त्यामुळे त्यांना सर्वाधिक रोख पारितोषिक मिळालायला हवं होतं, असे म्हटले जात आहे. पण यावेळी त्यांना खेळाडूंएवढे समान रोख पारितोषिकही देण्यात आलेले नाही. त्यामुळे काही चाहते महाराष्ट्राच्या सरकारवर नाराज आहेत आणि त्यांना अमोल मुझुमदार यांच्यावर पुन्हा एकदा अन्याय झाल्याचे वाटत आहे. वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूंचे सर्व राज्य सरकार सत्कार करत आहेत. पण भारताचे प्रशिक्षक हे महाराष्ट्राचे आहेत. पण तरीही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे आता म्हटले जात आहे. त्यामुळे अमोल मुझुमदार यांच्याबाबत महाराष्ट्र सरकार फेरविचार करणार का, याची उत्सुकता आता सर्वांना असेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.