शरीरातील गाठी विरघळतील? फक्त प्या 'या' बियांचे पाणी; कॅन्सरच्या गाठींवरही मिळू शकतो आराम? आचार्य बालकृष्णांचा दावा
शरीराच्या कोणत्याही भागात – जसे की मान, बगल (काखेत), पाठ, कंबर, मांडी, स्तन किंवा त्वचेखाली एखादी गाठ तयार झाली, तर अनेकदा लोक घाबरून जातात. काही वेळा या गाठी साध्या असतात आणि त्या फारसा धोका निर्माण करत नाहीत. मात्र, काही परिस्थितीत अशा गाठी गंभीर आजारांचे संकेतही असू शकतात. त्यामुळे शरीरात अचानक गाठ जाणवल्यास तिच्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नसते.
तज्ज्ञांच्या मते, शरीरात गाठ तयार होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. सर्वांत सामान्य कारण म्हणजे त्वचेखाली चरबीच्या पेशी जमा होणे. त्यामुळे तयार होणारी गाठ बहुतेक वेळा मऊ असते आणि हळूहळू वाढत जाते. अशा गाठींना साधारणपणे लिपोमा, असे म्हणतात. बहुतेक प्रकरणांमध्ये त्या निरुपद्रवी असतात.
काही वेळा त्वचेखाली पाणी, पू किंवा तेलकट द्रव साचल्यामुळे सिस्ट (Cyst) तयार होऊ शकते. अशा गाठी गोलाकार आणि हलक्या हालचालीने हलणाऱ्या वाटतात. कधी कधी त्यामध्ये लालसरपणा आणि वेदनाही जाणवू शकतात.
त्याशिवाय जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गामुळे लिम्फ नोड्स सुजणे हेदेखील गाठी निर्माण होण्यामागील एक सामान्य कारण आहे. अशा गाठी प्रामुख्याने मान, बगल किंवा मांडीजवळ दिसतात. महिलांमध्ये हार्मोन्समधील बदल - जसे की मासिक पाळी, पीसीओएस, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती यांमुळेही स्तन किंवा मान परिसरात गाठी जाणवू शकतात. मात्र, काही वेळा गाठ कठीण स्वरूपाची आणि दीर्घकाळ टिकणारी असेल, तर ती ट्युमर किंवा कर्करोगासारख्या आजारांची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.दरम्यान, आयुर्वेदातील काही उपाय शरीरातील सूज आणि गाठी कमी करण्यास मदत करू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. आयुर्वेदिक तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, चाकवत (बथुआ) या पालेभाजीच्या बियांचे पाणी नियमितपणे घेतल्यास शरीरातील सूज कमी होण्यास आणि काही प्रकारच्या गाठींवर नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते.आयुर्वेदानुसार चाकवत ही केवळ साधी भाजी नसून, औषधी गुणधर्मांनी समृद्ध अशी वनस्पती मानली जाते. तिच्या बियांमध्ये फ्लेवोनॉइड्स आणि फायटोकेमिकल्ससारखे घटक आढळतात, जे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे लिम्फ नोड्सची सूज, लिपोमा किंवा सिस्टसारख्या समस्या कमी होण्यास सहाय्य होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, शरीरात विषाक्त घटक जमा होणे हेदेखील गाठी तयार होण्यामागील एक कारण असू शकते. चाकवतच्या बियांचे पाणी यकृत (लिव्हर) शुद्ध करण्यास आणि रक्त शुद्ध ठेवण्यास मदत करू शकते, असे आयुर्वेदात सांगितले जाते. त्यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया सुधारण्यास मदत होते.
चाकवतच्या बियांचे पाणी कसे तयार करावे?
त्यासाठी एक चमचा चाकवताच्या बिया आणि एक ग्लास पाणी घ्या. रात्री या बिया पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे पाणी हलकेसे उकळून गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. काही दिवस या पाण्याचे नियमित सेवन केल्यास शरीरातील सूज आणि गाठींमध्ये फरक जाणवू शकतो, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात.
तथापि, शरीरात कोणतीही गाठ दीर्घकाळ टिकत असल्यास किंवा ती वेदनादायक होत असल्यास स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. योग्य तपासणी आणि उपचार केल्यास अनेक गंभीर आजार वेळेवर ओळखता येऊ शकतात.
(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही. अधिक तपशिलासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी ' सांगली दर्पण 'घेत नाही.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.