सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल, उद्धव ठाकरे गटाला झटका
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबबात सुरु असलेल्या सुनावणीत आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी 7 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी (16 फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होत्या. त्यावर आज (17 फेब्रुवारी) सकाळच्या सत्रात कोर्टाने निकाल जाहीर केलाय.
त्यानुसार, उद्धव ठाकरे गटाने हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे अशी केलेली मागणी कोर्टाने फेटाळली आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ठाकरे गटाची ही मागणी नाकारली आहे. तसेच या प्रकरणी आता पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.