Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर. जरांगेंच्या आंदोलनावरून कोर्टानं फडणवीसांना फटकारले

कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर. जरांगेंच्या आंदोलनावरून कोर्टानं फडणवीसांना फटकारले

मुंबईत मनोज जरांगे पाटील  आंदोलन करणार आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असा अंदाज लावला जात आहे. तशी भिती व्यक्त करणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करतांना हायकोर्टानं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला फटकारले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने कायदा-सुव्यस्था बिघडल्यास राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टिप्पणी हायकोर्टानं केली आहे. याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी याचिकेत मनोज जरांगे पाटील मुंबईला वेठीस धरणार असून त्यांना उपोषणाला परवानगी देऊ नये असे म्हंटले होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.