Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राम मंदिर झालं, आता ऒरंगजेबाची कबर उखडून फेकू :, संत परमहंस आचार्य यांचं विधान

राम मंदिर झालं, आता ऒरंगजेबाची कबर उखडून फेकू :, संत परमहंस आचार्य यांचं विधान 


आयोध्येतील तपस्वी छावणीमधील संत परमहंस आचार्य नेहमी कोणत्या ना कोणत्या विधानाने चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण होतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा वध करणार, असं वक्तव्य केलं होतं. यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. आता परमहंस आचार्य यांनी पुन्हा एक मोठं विधान केलं आहे.


राम मंदिर झालं, आता पुढचं काम महाराष्ट्रातील ऒरंगजेबाची कबर उखडून फेकून द्यायची आहे, असं विधान परमहंस आचार्य यांनी केलं आहे. केवळ औरंगजेबच नाही, तर अयोध्येतील राम मंदिराला अडचणी आणल्या त्यांच्या सर्वांच्या कबरी खोदून टाकू, असं विधानही परमहंस आचार्य यांनी केलंय. त्यांच्या या विधानामुळे मोठा वादंग उठण्याची शक्यता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.