Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता मूळव्याधाच्या त्रासाने आपले केले हाल? उठता - बसता येईना :, ' ही ' रानभाजी खाल्यास मिळेल आराम

आता मूळव्याधाच्या त्रासाने आपले केले हाल? उठता - बसता येईना :, ' ही ' रानभाजी खाल्यास मिळेल आराम 


बिघडती जीवनशैली आरोग्याची पुरेपूर वाट लावत आहे. यामध्ये आहाराबाबत हयगय करणे सगळ्यात जास्त महागात पडतं. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात, असे वारंवार सांगून देखील लोक आपल्या आरोग्याची काळजी घेत नाहीत.
यामुळे बरेच लोक पोटाच्या समस्या, मुतखडा होणे आणि त्रासदायी मुळव्याध सारख्या त्रासांना सामोरे जातात. यांपैकी मूळव्याध अतिशय वेदनादायी त्रास आहे. मूळव्याधाचा त्रास होणाऱ्या लोकांना उठणे आणि बसने देखील मुश्किल होणे. अशा लोकांसाठी आज आम्ही एक खास उपाय घेऊन आलो आहेत.
जसे ज्या त्या मोसमातील फळे खाणे आरोग्यदायी असते.  अगदी तसेच पावसाळ्यात आवर्जून भेटणाऱ्या रानभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फलदायी असतात. जर तुम्ही मुतखडा किंवा मुळव्याधाच्या त्रासाने हैराण झाले असाल तर तांदुळजा ही रानभाजी आवर्जून खावी. यामुळे एकतर खळखळून मुतखडा बाहेर पडतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळव्याधाचा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकतो. चला तर ही रानभाजी खाण्याचे काही फायदे जाणून घेऊया.

तांदुळज्याची भाजी खाण्याचे फायदे 
1. तांदळज्याची भाजी खाल्ल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात. त्यापैकी एक म्हणजे पोटाच्या समस्या दूर होतात. या भाजीचे नियमित सेवन केल्याने पॉट साफ होते आणि परिणामी बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या जाणवत नाहीत.

2.  तांदुळज्याची भाजी नियमित आहारात असल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे तुमचे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्सीफाय होते.

3. तांदुळज्याची भाजी तेल न वापरता तुपाचा वापर करून बनवा. अशी भाजी खाल्ल्याने जुलाबाची समस्या लगेच थांबू शकते.

4. तांदुळज्याची भाजी खाणे पोटासह आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. या भाजीतील काही घटक पोटाच्या आतड्यांमधील घाण बाहेर काढतात आणि यामुळे आतड्यांचे कार्य सुधरते 

5. तांदुळज्याच्या भाजीत भरपूर फायबर असते.  त्यामुळे या भाजीचे सेवन केल्याने पोट बराच वेळ भरलेले वाटते. यामुळे इतर जंक फूड किंवा अन्य पदार्थ खाल्ले जात नाहीत. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.

6. त्यामुळे या भाजीचे सेवन केल्याने पोट बराच वेळ भरलेले वाटते. यामुळे इतर जंक फूड किंवा अन्य पदार्थ खाल्ले जात नाहीत. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.

6. तांदुळज्याची भाजी खाल्ल्याने लघवी साफ होत नसेल तर ही समस्या सुद्धा दूर होते. त्यामुळे आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ही भाजी खाल्ल्यास युरिनच्या समस्या होत नाहीत.

7. तांदुळज्याची भाजी आयुर्वेदिक औषधी वनस्पती असल्याने यातून शरीराला सी जीवनसत्त्व मिळते. 

8.  ज्यामुळे पित्त कमी होतं, मूळव्याध, मुतखडा असा समस्या दूर होतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.