फेब्रुवारी महिन्यातील 19 तारीख ही इतिहासातील अशी तारीख आहे. ज्या दिवशी संपूर्ण देश आपल्या आवडत्या राज्याची जयंती सोहळा साजरा करतो. शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला होता. त्याच शिवबाने पुढे स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. रयतेचे राज्य स्थापन करून त्यांनी एक आदर्श घालून दिला. शिवरायांचे जीवन एक प्रेरणास्त्रोत आहे. परंतु. शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज हा त्यांचा प्रवास सोपा तर नक्कीच नव्हता. कारण, त्यांना विरोधकांना तोंड देतांना त्याचबरोबर त्याकाळातील स्वकियांशी देखील लढाई करावी लागली. अनेकदा तह करावे लागले तर अनेकदा दुश्मनांच्या छाताडावर जाऊन ते बसले. छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात मोठी संपत्ती होती ती गड किल्ले. चला तर जाणून घेऊया, शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात किती गड किल्ले जिंकले होते. लढाई करून दुश्मनांच्या तोंडचे पाणी पळवले. तसेच त्यांच्या कार्यकाळात किती गड किल्ले त्यांनी बांधले होते. वाचा सविस्तर...!
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कुठे!
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केले. जाती-पातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते.
महाराष्ट्राचा संपन्न वारसा
शिवाजी महाराजांना मोठी दूरदृष्टी होती. स्वराज्यासाठी काय केले पाहिजे, त्याचा भविष्यात कसा लाभ होऊ शकतो. भविष्यात रयतेला कसा लाभ मिळेल याची जाणीव राजांना होती. स्वराज्य स्थापनेनंतर ते विस्तारले कसे जाईल, याचा ते सदैव विचार करत असत. त्यांनी बांधलेले गडकिल्ले हे याचे उत्तम उदाहरण आहे. हे गडकिल्ले इतके अभेद्य असत की शत्रूला त्यावर चाल करून जाताना विचार करावाच लागत असे. किल्ल्यांभोवतीची तटबंदी मजबूत असे आणि त्यासाठी किल्ल्यावर केलेल्या खोदकामांतून मिळालेलेच दगड वापरले जाते. त्यांनी जलदुर्गांची निर्मिती केली. हा संपन्न वारसा आजही महाराष्ट्र अभिमानाने सांगतो आहे.
शिवजयंतीचा इतिहास काय?
1870 साली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात केली. पुण्यापासून 100 किमी अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. नंतर लोकमान्य टिळकांनी जयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.
शिवजयंतीचे महत्त्व..!
छत्रपती शिवाजी महाराज या युगपुरूषाला फक्त एक किंवा दोन दिवस शिवजयंती निमित्त मानवंदना देणं हे नक्कीच पुरेसं नाही. महाराजांचे कार्य इतके महान आहे की महाराष्ट्रातील प्रत्येकाने वर्षांचा प्रत्येक दिवस जरी शिवजयंती साजरी केली तरी ते कमीच पडावे. शिवरायांचा आदर्श समोर ठेवून जीवन जगणे म्हणजे खरी शिवजयंती साजरी करणे होय. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर जनतेच्या कल्याणाचा विचार केला, स्वराज्य निर्मितीसाठी आयुष्य वेचले, राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांचे पालन केले, भवानी मातेची आराधना केली, महिलांना आदराचे स्थान दिले त्याचप्रमाणे प्रत्येकाने शिवरायांचे हे गुण स्वतःच्या अंगी भिनवणे म्हणजे शिवरायांना दिलेली खरी मानवंदना आहे.
शिवजयंती कशी साजरी करतात!
महात्मा ज्योतीबा फुले यांनी 1869 साली रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे समाधीस्थळ शोधून काढले आणि महाराजांच्या जीवनावर आधारीत पहिला आणि प्रदीर्घ पोवाडा रचला. शिवरायांचे कार्य महाराष्ट्रातील घराघरात पोहचावे यासाठी त्यांनी 1870 साली पहिल्यांदा सार्वजनिक शिवजयंतीचा कार्यक्रम पुण्यात केला. तेव्हा पासून महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी होऊ लागली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही या दिवसाला एक महत्त्वाचे स्थान आहे. विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंतीच्या कार्यात मोलाचे सहकार्य केले. ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षदेखील होते. आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते.
शिवजंयती कशी साजरी करावी याबाबतही समाजात मतांतरे दिसून येतात. सध्यातरी सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, शिवाजी महाराजांची गाणी ऐकणे, शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणे, सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, राजकीय पक्षांचे भव्य दिव्य कार्यक्रम, बाईक रॅली, सार्वजनिक ठिकाणी भव्य मिरवणूका काढून, एकमेकांना शिवाजी महाराजांचे सुविचार पाठवून, शिवाजी महाराजांची पुस्तके भेट देऊन, शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित नाटके अथवा पथनाट्याचे आयोजन करून, राजमाता जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन आणि त्रिवार मुजरा करून, भव्य दिव्य व्याख्यानमालांचे आयोजित करून अथवा रक्तदानासारखे सामाजिक कार्यक्रम करून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो.
शिवाजी महाराजांच्या किल्ल्याविषयी!
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळात गड किल्ले यावरुन राजांची शक्ती किती असावी, याचा अंदाज बांधता येईल. यामध्ये डोंगरी किल्ले, भुईकोट व सागरी किल्ल्यांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडू व गोवा या सध्याच्या राज्यातील किल्ल्यांचाही समावेश आहे. यापैकी सुमारे 11 किल्ले शिवाजी महाराजांनी बांधल्याची नोंद एका बखरीत आहे. तसेच त्यांनी 49 किल्ले डागडुजी करून त्यात आवश्यक ते बदल केले व ते अभेद्य बनविले, अशीही नोंद करण्यात आलेली आहे. या किल्ल्यांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखत्यारित (स्वराज्याच्या मालकीच्या) त्यावेळी असलेल्या, (शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या/शिवाजी महाराजांनी बांधलेल्या) किल्ल्यांचा समावेश आहे. या यादीचा उद्देश शिवाजी महाराजांचे माहिती व त्यांंचे काम दाखविण्याचा आहे. त्यांची मज किती पर्यंत होती, स्वराज्याचा विस्तार किती मोठा होता, याचे यातून दर्शन घडते.
घाट व त्या ठिकाणी बांधलेले किल्ले..!
अंबाघाट - रसाळगड
कामथाघाट - कांगोरी
कुंडीघाट - मौजगड
कुंभार्ली घाट - जयगड
कुसूर घाट - भिवगड, टाकगड
पिपरी घाट - सुधागड
माताघाट - भवानगड
रणतोंडी घाट - प्रतापगड
विशालगड घाट - विशालगड, माचाळगड
शेवल्या घाट - मानगड
शिवरायांच्या ताब्यात होते हे गड किल्ले, वाचा संपूर्ण यादी..!
मावळ प्रांत
(सध्याचे मावळ, सासवड, जुन्नर आणि खेड हे तालुके.) येथे त्यांचे एकूण 19 किल्ले होते.
१) कुंवारी किल्ला
२) केळना किल्ला
३) तिकोना किल्ला
४) तुंग किल्ला
५) तोरणा किल्ला
६) दातेगड किल्ला
७) दौलतमंगळ किल्ला
८) नारायणगड किल्ला
९) पुरंधर(पुरंदर) किल्ला
१०) मोरगिरी किल्ला
११) राजगड किल्ला
१२) राजमाची किल्ला
१३) रुद्रमाळ किल्ला
१४) रोहिडा किल्ला
१५) लोहगड किल्ला
१६) विसापूर किल्ला
१७) शिवनेरी किल्ला
१८) सिंहगड किल्ला
सातारा व वाई प्रांतातील किल्ले!
एकूण 11 किल्ले.
१) कमलगड किल्ला
२) चंदनगड किल्ला
३) ताथवडा किल्ला
४) नांदगिरी किल्ला
५) परळी (सज्जनगड) किल्ला
६ पांडवगड किल्ला
७) महिमानगड किल्ला
८) वंदनगड किल्ला
९) वर्धनगड किल्ला
१०) वैराटगड किल्ला
११) सातारा किल्ला
१२) वासोटा किल्ला
१३) वारूगड किल्ला
कऱ्हाड प्रांत
१) कसबा कऱ्हाड किल्ला
२) भूषणगड किल्ला
३) मच्छिंद्रगड किल्ला
४) वसंतगड किल्ला
पन्हाळा प्रांत
१) खेळणा किल्ला
२) गगनगड किल्ला
३) गजेंद्रगड किल्ला
४) पन्हाळा किल्ला
५) पावनगड किल्ला
६) बावडा किल्ला
७) भिवगड किल्ला
८) भुदरगड किल्ला
९) भूपाळगड किल्ला
१०) मदनगड किल्ला
११) रांगणा किल्ला
१२) विशाळगड किल्ला
१३) चांदोली गड
कोकण, बंधारी व नळदुर्ग प्रांत
१) मालवण
२) सिंधुदुर्ग
३) विजयदुर्ग
४) जयदुर्ग
५) रत्नागिरी
६) सुवर्णदुर्ग
७) खांदेरी
८) उंदेरी
९) कुलाबा
१०) राजकोट
११) अंजनवेल
१२) रेवदंडा
१३) रायगड
१४) पाली
१५) कलानिधीगड
१६) आरनाळा
१७) सुरंगगड
१८) मानगड
१९) महिपतगड
२०) महिमंडन
२१) सुमारगड
२२) रसाळगड
२३) कर्नाळा
२४) भोरप
२५) बल्लाळगड
२६) सारंगगड
२७) माणिकगड
२८) सिंदगड
२९) मंडणगड
३०) बाळगड
३१) महिमंतगड
३२) लिंगाणा
३३) प्रचीतगड
३४) समानगड
३५) कांगोरी
३६) प्रतापगड
३७) तळागड
३८) घोसाळगड
३९) बिरवाडी
४०) भैरवगड
४१) प्रबळगड
४२) अवचितगड
४३) कुंभगड
४४) सागरगड
४५) मनोहरगड
४६) सुभानगड
४७) मित्रगड
४८) प्रल्हादगड
४९) मंडणगड
५०) सहनगड
५१) सिकेरागड
५२) वीरगड
५३) महीधरगड
५४) रणगड
५५) सेटगागड
५६) मकरंदगड
५७) भास्करगड
५८) माहुली
५९) कावन्ही
60) पालगड
त्र्यबंक प्रांत
आवढा
कणकई
करोला
गडगडा
चांदवड
चावंडस
जवळागड
जीवधन
टणकई
त्र्यंबक
थळागड
पटागड
बाहुला
मनरंजन
मनोहरगड
मार्कंडेयगड
मासणागड
मृगगड
राजपेहर
रामसेज
सबलगड
सिद्धगड
हडसर
हरींद्रगड
हर्षण
बागलाण प्रांत
1) साल्हेर
2) मुल्हेर
3)सालोटा
4) मोरा प्रांत
ड 5) हरगड 6)न्हावीगड 7)हनुमानगड 8)तांम्रगड 9)मांगीतुंगी 10)पिसोळ 11)डेरमाळ 12)कर्हेगड 13)बिष्टागड 14)दुंधागड 15)अजमेरागड 16)चौल्हेरगड 17)भिलाईगड 18)पिंपळा 19)कंचणा 20)इंद्राई 21)धोडप 22)राजधेर 23)कोळधेर 24)चांदवड 25)प्रेमगीरी 26)कंक्राळा २७)लळिंग
बनगड प्रांत
(धारवाड जिल्ह्यातील बराचसा भाग)
१) वनगड
२) गहनगड
३) चिमदुर्ग
४) नलदुर्ग
५) मिरागड
६) श्रीमंतदुर्ग
७) श्रीगदनगड
८) नरगुंद
९) महंतगड
१०) कोपलगड
११) बाहदूरबिंडा
१२) व्यंकटगड
१३) गंधर्वगड
१४) ढाकेगड
१५) सुपेगड
१६) पराक्रमगड
१७) कनकादिगड
१८) ब्रम्हगड
१९) चित्रदुर्ग
२०) प्रसन्नगड
२१) हडपसरगड
२२) कांचनगड
२३) अचलगिरीगड
२४) मंदनगड
फोंडे व बिदनूर प्रांत
१) कोडफोंडे
२) कोट काहूर
३)कोट बकर
४) कोट ब्रम्हनाळ
५) कोट कडवळ
६) कोट अकोले
७) कोट कठर
८) कोट कलबर्गे
९) कोट शिवेश्वर
१०) कोट मंगरुळ
११) कोट कडणार
१२) कोट कृष्णागिरी
कोल्हापूर व बाळापूर प्रांत
१) कोल्हार२) ब्रम्हगड३) वडन्नगड४) भास्करगड५) महीपाळगड६) मृगमदगड७) आंबेनिराईगड८) बुधला कोट९) माणिकगड१०) नंदीगड११) गणेशगड१२) खळगड१३) हातमंगळगड१४) मंचकगड१५) प्रकाशगड१६) भीमगड१७) प्रेईवारगड१८) सोमसेखरगड१९) मेदगिरीचेनगड२०) श्रीवर्धनगड२१) बिदनूरकोट२२) मलकोल्हारकोट२३) ठाकूरगड२४)सरसगड२५) मल्हारगड२६) भूमंडलगड२७) बिरुटकोट
श्रीरंगपट्टण प्रांत
१) कोटधर्मपुरी
२) हरिहरगड
३) कोटगरुड
४) प्रमोदगड
५) मनोहरगड
६) भवानीदुर्ग
७) कोट अमरापूर
८) कोट कुसूर
९) कोट तळेगिरी
१०) सुंदरगड
११) कोट तळगोंडा
१२) कोट आटनूर
१३) कोट त्रिपादपूरे
१४) कोट दुटानेटी
१५) कोट लखनूर
१६) कळपगड
१७) महिनदीगड
१८) रंजनगड
१९) कोट आलूर
२०) कोट शामल
२१) कोट विराडे
२२) कोट चंद्रमाल
कर्नाटक प्रांत
१) जगदेवगड२) सुदर्शनगड३) रमणगड४) नंदीगड५) प्रबळगड६) बहिरवगड७) वारुणगड८) महाराजगड९) सिद्धगड१०) जवादीगड११) मार्तंडगड१२) मंगळगड१३) गगनगड१४) कृष्णगिरी१५) मल्लिकार्जुनगड१६) कस्तूरीगड१७) दीर्घपलीगड१८) रामगड
वेलूर प्रांत
१) कोट आरकट
२) कोट लखनूर
३) कोट पळणापट्टण
४) कोट त्रिमल
५) कोट त्रिवादी
६) पाळे कोट
७) कोट त्रिकोनदुर्ग
८) कैलासगड
९) चंजिवरा कोट
१०) कोट वृंदावन
११) चेतपाव्हली
१२) कोलबाळगड
१३) रसाळगड
१४) कर्मटगड
१५) यशवंतगड
१६) मुख्यगड
१७) गर्जनगड
१८) मंडविडगड
१९) महिमंडगड
२०) प्राणगड
२१) सामरगड
२२) साजरागड
२३) गोजरागड
२४) दुभेगड
२५) अनूरगड
चंदी प्रांत
१) राजगड२) चेनगड३) कृष्णागिरी४) मदोन्मत्तगड५) आखलूगड६) काळा कोट
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.