Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गरमीवर मात: उष्णतेच्या लाटे दरम्यान आरोग्य विम्याचे महत्त्व लेखक: भास्कर नेरुरकर,

गरमीवर मात: उष्णतेच्या लाटे दरम्यान आरोग्य विम्याचे महत्त्व लेखक: भास्कर नेरुरकर
 

हेड- हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स संपूर्ण भारतात उन्हाळा असह्य होत चालला आहे आणि वाढत्या तापमानामुळे निर्माण होणारी गरमी संबंधित आव्हाने गंभीर आरोग्यविषयक चिंतेमध्ये बदलत आहेत. 2025 जवळ येत असताना, वर्ष 1901 पासून नोंदी सुरू झाल्यापासून फेब्रुवारी महिना हा आजपर्यंतचा भारतातील सर्वात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. गुजरात, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश ही राज्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाच्या झळा सोसत आहेत.

या अति गरमीमुळे केवळ दैनंदिन जीवनात व्यत्यय येत नाही तर उष्माघात, निर्जलीकरण, त्वचेवर पुरळ, श्वसनाच्या समस्या आणि गरमी संबंधित विविध आजारांसह आरोग्यविषयक मोठ्या जोखमी देखील निर्माण होतात. हवामान बदलाचा आपल्या आरोग्यावर होणारा तीव्र परिणाम लक्षात घेता जागरूक राहणे आणि कृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या श्वेतपत्रिकेनुसार, जागतिक अर्थव्यवस्था आणि समाजासाठी अति गरमी ही सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक ठरत आहे. 

अंदाजानुसार 2030 पर्यंत, अति गरमीमुळे दरवर्षी 489,000 मृत्यू होऊ शकतात आणि परिणामी उत्पादकतेचे अंदाजे 2.4 ट्रिलियन डॉलर्सचे नुकसान होऊ शकते. शिवाय, 2050 पर्यंत, धोकादायक गरमीची पातळी दरवर्षी किमान एका महिन्यासाठी जगाच्या किमान अर्ध्या लोकसंख्येवर परिणाम करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे या वाढत्या संकटाला तोंड देण्याची निकड अधोरेखित होते.


उष्णतेच्या लाटेपासून संरक्षणात आरोग्य विम्याची भूमिका
गरमी संबंधित आजार वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे हृदय, मेंदू आणि मूत्रपिंड यासारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम करणाऱ्या गंभीर गुंतागुंती होऊ शकतात. अशा आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विमा संरक्षण असणे जीवनरक्षक असू शकते, कारण पॉलिसी सामान्यपणे आपत्कालीन रुग्ण वाहतूक, वैद्यकीय सहाय्य, निदान चाचण्या, औषधे आणि अगदी रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या खर्चांसह देखील सर्वसमावेशक संरक्षण देऊ करतात.

काही आरोग्य विमा पॉलिसी वार्षिक आरोग्य तपासणी, फोनद्वारे सल्लामसलत आणि आरोग्य कार्यक्रम यासारखे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा लाभ देखील प्रदान करतात, ज्यामुळे व्यक्तींना त्यांचे आरोग्य सक्रियपणे व्यवस्थापित करण्यास मदत होते. बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) संरक्षण हा एक आवश्यक लाभ आहे, जो अंगभूत वैशिष्ट्य म्हणून किंवा अतिरिक्त पर्याय म्हणून देऊ केला जातो. यामध्ये रुग्णालयात दाखल करण्याव्यतिरिक्त झालेले इतर वैद्यकीय खर्च समाविष्ट आहेत, जसे की डॉक्टरांचा सल्ला, निदान चाचण्या (उदा. रक्त चाचण्या किंवा एक्स-रे), आणि डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला गरमीमुळे चक्कर येत असेल किंवा निर्जलीकरण झाल्यासारखे वाटत असेल, तर तुमच्या पॉलिसीमध्ये कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय डॉक्टरांशी सल्लामसलत समाविष्ट असू शकते.
गरमी संबंधित आजारांसाठी आपत्कालीन संरक्षण
 
चांगले आरोग्य असूनही, अपघात आणि संसर्गामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती येऊ शकते. वेळेवर वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी विमा पॉलिसींमध्ये सामान्यतः रुग्णवाहिका किंवा हवाई रुग्णवाहिका यासारख्या आपत्कालीन वाहतूक सेवा समाविष्ट असतात. अति गरमीमुळे उद्भवणाऱ्या स्थिती - जसे की उष्माघात, अतिसार, जठराचा व आतड्याचा तीव्र दाह, गरमीमुळे येणारे पेटके, त्वचेवर पुरळ आणि निर्जलीकरण - सामान्यतः मानक आरोग्य विमा पॉलिसींमध्ये रुग्णालयात दाखल करण्याअंतर्गत समाविष्ट असतात.

गरमीमुळे त्वचेला गंभीर नुकसान झाल्यास, डेब्रिडमेंट (मृत ऊती काढून टाकणे), एस्केरोटॉमी (ऊतींचा जळलेला भाग काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया) किंवा स्किन ग्राफ्टिंग (त्वचा कलम करणे) सारख्या उपचारांची आवश्यकता असू शकते. याव्यतिरिक्त, अति घाम येणे किंवा गरमीमुळे होणारे पुरळ यांच्या गुंतागुंतींमुळे होणारे त्वचेचे संसर्ग सामान्यतः आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत समाविष्ट केले जातात. या पॉलिसींमध्ये बहुतेकदा संबंधित सेवांचा समावेश असतो, जसे की परिचर्या काळजी, डॉक्टरांचा सल्ला, औषधे आणि रुग्णालयात दाखल करताना जेवणाचा खर्च. तसेच, काही बेस पॉलिसी अंतर्गत ॲड-ऑन म्हणून उत्पन्नाच्या नुकसानासाठी भरपाई उपलब्ध आहे.  हे विमाधारक रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आणि काम करण्यास असमर्थ असलेल्या प्रत्येक दिवसासाठी निश्चित दैनिक रक्कम प्रदान करते, आजार बरा होण्याच्या दरम्यान आर्थिक सहाय्य देऊ करते.

हवामान बदल आणि आरोग्यसेवेचा वाढता खर्च
हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा तीव्र होत आहेत आणि नवीन आणि कालांतराने समोर येणाऱ्या आरोग्य आव्हानांना हातभार लावत आहेत. काही रोगांमध्ये वाढ आणि गरमी संबंधित स्थितींचा उदय अधिकाधिक स्पष्ट होत आहे. एक सुव्यवस्थित, सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना या विकसित होणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या नवीनतम वैद्यकीय उपचार, औषधे आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता सुनिश्चित करते.

रुग्णालयात दाखल झाल्यानंतरची काळजी - जसे की पाठपुरावा भेटी, आवश्यक औषधे आणि चालू प्रगतीवर देखरेख - पूर्णपणे बरे होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बहुतेक आरोग्य विमा पॉलिसींमध्ये निवडलेल्या योजनेनुसार, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी आणि नंतरच्या 30 ते 120 दिवसांचे खर्च समाविष्ट असतात. हवामान बदलाची तीव्रता वाढत असताना, मानवी आरोग्याला असलेल्या जोखमी अधिकाधिक स्पष्ट होत आहेत. उष्णतेच्या लाटांसारख्या टोकाच्या हवामान घटना आपल्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करतात. एकूण महागाईपेक्षा आरोग्यसेवेचा खर्च वेगाने वाढत असल्याने, विशेषतः आपत्कालीन परिस्थितींत किंवा दीर्घकाळापर्यंत उपचारांच्या वेळी, खिशातून कराव्या लागणाऱ्या खर्चाचा भार प्रचंड असू शकतो. त्यामुळे, अशा परिस्थितींत एक विश्वासार्ह आणि सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
 
आर्थिक सुरक्षेव्यतिरिक्त, दर्जेदार आरोग्यसेवेची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आरोग्य विमा महत्त्वाची भूमिका बजावतो. नियमित तपासणी, छाननी आणि तज्ञांचा सल्ला यामुळे आजार लवकर ओळखण्यास आणि व्यवस्थापित करण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे अधिक गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते. प्रतिबंधात्मक काळजीपासून ते रुग्णालयात दाखल झाल्यानंतरच्या मदतीपर्यंत, एक व्यापक पॉलिसी वैद्यकीय उपचाराच्या प्रत्येक टप्प्यावर समग्र संरक्षण प्रदान करते. उष्णतेच्या लाटा अधिक वारंवार आणि तीव्र होत असताना, एक मजबूत आरोग्य विमा योजना सुरक्षित करणे ही केवळ एक निवड नाही - ती तुमच्या आरोग्याचे आणि कल्याणाचे रक्षण करण्यासाठी एक आवश्यकता आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.