भाजप देशभरात धर्मांधतेचे विष कालवतंय : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
मुंबई : भाजपच्या ४६ व्या वर्धापनादिनानिमित्त नागपुरात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नागपुरात भाजपा कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. मात्र भाजपच्या या वर्धापन दिनावरून शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल (दि. ०६) शिवसंचार सेनेच्या लोगोचे अनावरण केले.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. आमदार आदित्य ठाकरे, पक्षाचे राज्यसंघटक अखिल चित्रे उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर वक्फ सुधारणा विधेयकावरून टीकेची झोड उठवली. भाजप देशभरात विविध समाजांमध्ये वाद पेटवत आहे. हिंदूंमध्ये मराठी अमराठीचा वाद ते करत आहेत.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप देशात धर्मांधतेचे विष कालवत आहे. ते विष उद्या देशाला भारी पडणार आहे. त्यामुळे देशातील सर्वांनीच आता जात-धर्माच्या पलीकडे जात एकत्र येण्याची गरज आहे. भाजपला कोणत्याही समाजाबद्दल प्रेम नाही. त्यांचा डोळा केवळ जमिनींवर आहे. वक्फच्या जमिनींनंतर आता ख्रिश्चन, जैन आणि हिंदू देवस्थानांच्याही जमिनी लाटून भाजप आपल्या मित्रांना देईल, असा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि मित्रांना देणार
पुढे बोलताना म्हणाले की, लोकांना तणावग्रस्त आयुष्य जगायला लावणे हे त्यांचे धोरण आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि मित्रांना देणार, पुढची पायरी ख्रिश्चनांची असेल. जैन, हिंदू देवस्थाने यांच्या जमिनीही हे लोक घेणार, हे मी आधीच बोललो होतो. कोणत्याही समाजाबाबत यांना प्रेम नसून, जमीन, मालमत्ता आणि व्यापार करणे एवढेच भाजपचे काम असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपने लोकांना फसवून मते घेतली आहेत. रामाचे नाव घेण्याची या लोकांची पात्रता नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. धर्मा-धर्मात भांडण लावून झुंजवत ठेवायचे धर्मा-धर्मात भांडण लावून झुंजवत ठेवायचे, दंगली घडवून आणायच्या, पोलिसी ससेमिरे लावायचे, मग बुलडोझर चालवायचे, केसेस दाखल करायच्या. लोकांना रोज तणावग्रस्त आयुष्यात जगायला लावायचे. त्यानंतर त्यांच्याकडील सगळ्या संपत्ती मित्रांना द्यायच्या, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.