पतीने पेटवून घेतलं आणि बायकोसह सासूला मारली मिठी, अन् नंतर...; नाशिकमधील घटनेने खळबळ
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीला सासरी पाठवलं नाही म्हणून पतीनं जे कृत्य केलं आहे, त्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरुन गेला आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हटल्यावर नवरा स्वतः सोबतच बायको आणि सासूच्या जीवावर उठला. पत्नीला पाठवलं नाही म्हणून पतीनं पेटवून घेतलं. इतकंच नाही तर पेटलेल्या अवस्थेत पतीने पत्नी आणि सासूला मिठी मारली. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी आणि सासू गंभीर जखमी आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावात ही घटना घडली आहे. याच घरात रविवारी मध्यरात्री जळीतकांड झालं. पत्नीला सासरी नांदायला नेऊ दिलं जात नाही या रागातून पतीनं याच घरात पेटवून घेतलं आणि पत्नी सासूलाही मरणाच्या दारात नेऊन ठेवलं. केदार हंडोरेनं मागच्या वर्षी दसऱ्याला रजिस्टर लग्न केलं. मात्र, पती केदार हंडोरे हा नात्याने पत्नीचा चुलत मावस काका लागत असल्यानं, घरच्यांनी मुलीला पाठवण्यास नकार दिला. तेव्हा भयंकर चिडलेल्या पती कुंदन हंडोरेनं घरातच स्वतःला पेटवून घेतलं. तो एवढ्यावरच थांबला नाही.. पेटलेल्या अवस्थेत त्यानं आपल्या पत्नी आणि सासूला मिठी मारली.
यात पती केदार हंडोरे 80 टक्के भाजला.. पत्नी 50 टक्के आणि सासू 65 टक्के भाजली.. या तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान केदार हंडोरेचा मृत्यू झाला. तर माय लेकींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सासरी घेऊन जाण्यासाठी झालेला वाद आणि त्यानंतर झालेलं जळीतकांड समजताच सिन्नर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमींचा जबाब घेऊन अधिकचा तपास सुरु आहे.
पत्नीला सासरी नेऊ दिलं नाही म्हणून नवऱ्यानं इतकं टोकाचं पाऊल उचलणं हे खरंच धक्कादायक आहे. आजकाल नात्यांमधली गुंतागुंत, वादावादी, दुरावा वाढत चाललाय. पण ज्या दोन जिवांना एकत्र राहायचंय त्यांनाही अडवलं गेल्यानं असे अघोरी गुन्हे घडताहेत. माणसाची सहनशिलता सगळ्याच बाबतीत कमी होत चाललीय का हाच प्रश्न यानिमित्तानं पडत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.