Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तळपायांमध्ये सतत आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित तळपायांना लावा 'हा' औषधी पदार्थ

तळपायांमध्ये सतत आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित तळपायांना लावा 'हा' औषधी पदार्थ


शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित तळपायांना लावा 'हा' औषधी पदार्थ राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे उष्णतेची लाट आली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. उष्णता वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात डिहायड्रेशन, अपचन आणि आरोग्यासंबंधित इतरही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात रोजच्या आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. थंड पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीर कायम थंड राहतं. बऱ्याचदा शरीराची प्रक्रिया बिघडल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.


उन्हाळा वाढल्यानंतर बऱ्याचदा तळपायांमध्ये आग होते. तळपायांमध्ये वाढलेली जळजळ काहीवेळा अतिशय तीव्र होऊन जाते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर सगळ्यात आधी तळपायांमध्ये जळजळ होते आणि पायांमध्ये वेदना होतात. अशावेळी पायांना मेंहदी लावावी. पायांना मेहंदी लावल्यामुळे तळपायांमध्ये होणाऱ्या वेदना आणि जळजळ कमी होऊन जाते. शरीराचे संतुलन राखण्यासाठी मेहेंदी लावावी. आज आम्ही तुम्हाला तळपायांना मेहेंदी लावल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी तळपायांना किंवा हातानं तुम्ही मेहेंदी लावू शकता. यामुळे मेहंदी शरीरात वाढलेली सर्व उष्णता बाहेर काढून टाकते आणि शरीर निरोगी राहते. मेंहदी त्वचेमधून थेट स्नायूंवर आणि नाड्यांवर परिणाम करते ज्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. मेहंदी लावल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.

 

झोपेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पायांना मेंहदी लावावी. मेहंदी लावल्यामुळे रात्रीच्या वेळी शांत झोप लागते. शरीरातील उष्णता कमी होऊन आरोग्याला अनेक फायदे होतात. पायांमधील थंड गुणधर्म मेंदूपर्यंत पोहचतात. त्यामुळे मेंदू शांत होतो. चांगल्या झोपेसाठी मेंदू शांत असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा हातापायांना अचानक सूज येते. हातापायांना सूज आल्यानंतर किंवा थकवा जाणवू लागल्यास तळपायांना मेहंदी लावावी. यामुळे जळजळ कमी होऊन वेदनांपासून आराम मिळेल. याशिवाय मेहंदीमध्ये असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करून स्नायूंना आराम देतात. याशिवाय पायांना हलके वाटू लागते. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.