एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढविण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे उज्ज्वला योजना असणाऱ्या व उज्ज्वला योजनेत नसणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.
आज केंद्र सरकारने गॅस सिलेंडरमागे ५० रुपये वाढले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी ही घोषणा केली. अनुदानित आणि विनाअनुदानित ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही वाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थी आणि गैर-लाभार्थी दोघांनाही लागू आहे.
आता केवढ्याला झाला सिलेंडर?
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, "एलपीजी सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ होईल. उज्ज्वला योजना धारकांना ५०० रुपयांवरून आता सिलेंडर घेण्यासाठी ५५० रुपये लागतील. इतरांसाठी ते ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये होईल. या भाववाढीचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
भाववाढीचे कारण काय?
केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुढे म्हणाले, "आम्ही दर २-३ आठवड्यांनी या भाववाढीचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढ पेट्रोल आणि डिझेलवरील ग्राहकांवर लादली जाणार नाही. त्या उत्पादन शुल्क वाढीचा उद्देश तेल विपणन कंपन्यांना गॅसच्या बाजूने झालेल्या ४३,००० कोटी रुपयांच्या नुकसानाची भरपाई करणे आहे. त्यामुळे सध्या फक्त एलपीजीच्या किंमती वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कधी लागू होणार भाववाढ
ही सुधारित भाववाढ उद्या म्हणजेच ८ एप्रिलपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४१ रुपयांची कपात केल्यानंतर काही दिवसांतच आता ही नवीन भाववाढ करण्यात आली. या सुधारणांनंतर, दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजीची सुधारित किरकोळ किंमत १,७६२ रुपये झाली आहे. हे एक दिलासा देणारे आहे, कारण १ मार्च रोजी ओएमसींनी प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.