पुणे: मुंबई पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक सागर विलास धुमाळ (वय ३२) यांचे सोमवारी (ता. ७) अल्पशा आजाराने वाशी येथील एमजीएम रुग्णालयात निधन झाले. सागर धुमाळ यांच्या निधनामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
सागर धुमाळ यांचे मुळ गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ. शेतकरी कुटुंबातील त्यांना जन्म. गरिब कुटुंबातून ते पुढे आले होते. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी अनेक गुन्हे उघड करताना त्यांना सर्वसामान्य नागरिकांना मदत केली होती. सोशल मीडियावरही ते सक्रीय होते. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी अनेक युवकांना ते मार्गदर्शन करत होते. सागर धुमाळ यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे. अनेकांसोबत त्यांची मैत्री होती. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समजताच शिरूर तालुक्यातून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुली, आई-वडिल आणि एक भाऊ असा परिवार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.