हर घर तिरंगा महोत्सवांतर्गत विटा येथे 9 ऑगस्ट रोजी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन
सांगली, दि. 5, : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा महोत्सव 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले आहे. खानापूर तालुका प्रशासनाच्या वतीने दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता बळवंत महाविद्यालय विटा येथील महाविद्यालयाच्या पटांगणात सुमारे 1 हजार 200 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगोच्या प्रतिकृतीमध्ये विद्यार्थ्यांना उभे करून लोगोची प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती खानापूर-विटा तहसिलदार ऋषिकेत शेळके यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.