महाराष्ट्राने ओवाळून टाकलेली घाण म्हणजे राणे कुटुंब; ठाकरे गटाच्या नेत्याची टिका
अंकुश राणे हत्या प्रकरणी नितेश आणि नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा मग उद्धव ठाकरेंची टेस्ट करा. नितेश राणेंची झोप उडाली आहे. भाजपने नितेश राणे यांच्यावर महाराष्ट्रातील युवकांची डोके भडकवून, महाराष्ट्रात दंगे भडकवण्याची सुपारी दिलीय, असा गंभीर आरोप शरद कोळी यांनी केला आहे.
कर्नाटकातील जनतेने भाजपला मुळासकट उपटून फेकलं आहे. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. हे भाजपला कळून चुकलं आहे. त्यामुळे भाजपवाल्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांची पायाखालील वाळू सरकली आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.