Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'अशी दादागिरी चालणार नाही', चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी, बाधित म्हणाले 'तुम्हाला टाहो फोडून'

'अशी दादागिरी चालणार नाही', चंद्रकांत पाटील आणि शेतकऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी, बाधित म्हणाले 'तुम्हाला टाहो फोडून'
 

शक्तिपीठ महामार्ग आंदोलक आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या मध्ये सांगलीत तू-तू-मै-मै चा प्रकार घडला आहे. शक्तीपिठाच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेऊन चर्चा करण्याची मागणी केली.  मात्र चंद्रकांत पाटलांनी बसून नाही उभं राहूनच चर्चा होणार अशी भूमिका घेतली. यावेळी त्यांनी शांततेचं बोला असा दम देखील आंदोलकांना भरला. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे.

यावेळी मंत्री चंद्रकांत पाटलांनी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही मग तुम्ही कोण? जमीन ताब्यात घेतल्या आहेत का? असा सवाल करत शेतकऱ्यांनाच दमात घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही मागील वर्षभरापासून टाहो फोडून सरकारला शक्तीपीठ महामार्गाचं करा. आम्ही उद्ध्वस्त, बेरोजगार होत आहोत. आमचं मरण आलं आहे असं सांगत चंद्रकांत पाटलांसमोर व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.
चंद्रकांत पाटील यांनी आत बसून, नाही इथं उभं राहूनच बोलणार. अशी दादागिरी चालणार नाही असं सुनावलं. उभं राहून बोला, मी थांबलो आहे ना येथे. पळून चाललो आहे का ? अशी विचारणाही त्यांनी केली. यादरम्यान मोबाईलवर व्हिडीओ काढला जात असल्याने ते संतापले. शिष्टमंडळाला वेळ दिला आहे, मग काय पिक्चर बनवतो का, ते डिलीट करा. यामुळेच चळवळीचे घोटाळे झाले आहेत असाही संताप त्यांनी मांडला.

त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रकांत पाटलांचा ताफा जात असताना जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं होतं. यादरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे

शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे यावेळी म्हणाले की, "सांगलीमधील बाधित शेतकरी टाहो फोडून सांगत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे. इतकं असूनही आज आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील फक्त 5 लोकांचा विरोध आहे असं म्हणत आहेत. बाकी शेपाचशे लोकांचं समर्थन आहे असा दावा करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू का दिसत नाही हा बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न आहे".

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.