इंद्रायणी नदीवरील कुंडमाळ इथंला पूल कोसळला. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. एकीकडे जोरदार पाऊस पडत होता. इंद्रायणी नदीला उधाण आलं होतं. त्या वेळी पर्यटक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमले होते. अशातच हा पुल एकदम कोसळला. त्यात अनेक लोक वाहून गेल्याचं बोललं जात आहे. पण या दुर्घटनेत एनडीआरएफने काही लोकांना वाचवलं आहे. त्यात एक महिलेचा ही समावेश आहे. त्या महिलेने त्यावेळी नक्की काय झाल विशेष म्हणजे ही महिला वाचली असली तरी तिचा पती आणि मुलगा कुठे आहे हे तिला माहित नाही
दुपारी तीन साडेतीनची वेळ होती. रविवार असल्याने कुंडमाळ इथं मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. इंद्रायणी नदी, निसर्गरम्य परिसर आणि इथं असलेले कुंड पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने आले होते. या दुर्घटनेत वाचलेली महिला हा पुल कसा कोसळला, त्या आधी काय झालं हे सर्व तिने सांगितलं. पुल कोसळला त्यावेळी साडेतीन वाजले होते असं तिने सांगितलं. त्या आधी याच पुलावर मोठ्या प्रमाणात लोक उभे होते असं तिने सांगितलं.
लोकांची गर्दी इतकी वाढली होती की पुलाल ते वचन पेलवलं नाही.त्याच वेळी पुलावर आम्हाल तीन गाड्या ही दिसल्याचं तिने सांगितलं. पुल हलायला लागला होता. कुणाला काही समजण्या आत पुल कोसळला. त्यावेळी मी ही पुलावर होते असं या महिलेने सांगितलं. पण नशिबाने आपण बचावलो असं तीने स्पष्ट केलं. आपल्या बरोबर आपले पती आणि मुलगा ही होता. पण ते कुठे आहेत हे आपल्याला माहित नाही असंही तिने यावेळी सांगितलं. आपला हात फ्रँक्चर झाल्याचं ही तिने सांगितलं. शिवाय त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत. या घटनेनं त्या हादरून गेल्या आहेत.दुसरीकडे अमोल घुले हा तरुण ही या दुर्घटनेतन बचावला. पुलावर मोठ्या प्रमाणात लोक उभे होते. ते सगळेच पाण्यात पडल्याचं तो सांगतो. पूल पडण्या आधी पाच मिनिटे तो हलत होता असं अमोल सांगतो. तरी ही लोक एकमेकांशी त्यावेळी बोलत होते. ते आपल्या जागेवरू हलत नव्हते. त्यांना आपण पुढे चला असं सांगत होतो. पण कुणीही ऐकलं नाही. शेवटी पुल कोसळला. पुलावर त्यावेळी दोन्ही बाजून टु व्हीलर येत होत्या असं ही त्याने सांगितले. ज्या वेळी पूल कोसळला त्यावेळी आपण एका रॉडला पकडलं, त्यामुळे आपला जीव वाचला आपण बराच वेळी त्या रॉडला पकडून होतो असं अमोल यांनी सांगितलं. सध्या त्यांच्यावर तळेगावमध्ये उपचार सुरू आहेत.दुसऱ्या तरुणीने सांगितलं की पुलावर पन्नास पेक्षा जास्त लोक होते. शिवाय गाड्याही होत्या. कुणीही पोलिस तिथे नव्हते. आम्ही पुलाच्या काठावर होतो त्यामुले आम्ही वाचले. पण आमच्या समोर पाण्यात अनेक लोक वाहून गेले. ते आम्ही डोळ्याने पाहिले. पण किती जण वाहून गेले हे सांगता येणार नाही असं ही तिने सांगितले. ज्या वेळी ब्रिज कोसळत होता त्यावेळी तो हलत होता. तोअचानक मध्येच तुटला. असं सांगितलं. धोकादायक बोर्ड तिथे लावला होता. पण तरीही गाड्या त्यावरून नेल्या जात होत्या असं लतिका हिने सांगितलं. ती दिल्लीवरून पुण्यात फिरण्यासाठी आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.