माझी वर्दी द्या, घरी जायचंय; पोलिस अधिकाऱ्याने जीव दिला, महिला शिपायाशी जवळीक अन्.. चॅटिंगमध्ये काय-काय?
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या जालौन कोंच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने आपल्या आयुष्याची अखेर केली. त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आपला जीव दिल्याची माहिती आहे. या प्रकरणात आता नवीन खुलासे समोर येत आहेत.
अरुण कुमार राय असं जीव देणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अधिकाऱ्याची एका महिला कॉन्स्टेबलसोबत जवळीक वाढली होती. सहकारी पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिला कॉन्स्टेबलने स्टेशन इन्चार्जचे काही व्हिडिओ आणि चॅट्स सेव्ह करुन ठेवले होते, ते वापरून ती त्यांना सतत त्रास देत होते.
आता याप्रकरणी या महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. तसेच, तिच्या मोबाइलचाही तपास सुरु आहे. ज्यामध्ये पोलिसांना काही मेसेज सापडले आहेत. अरुण कुमार राय यांच्या मृत्यू प्रकरणात महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्माला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या लेखी तक्रारीवरून तिची चौकशी केली जात आहे. सूत्रांनुसार, मीनाक्षी आणि अरुण यांच्यात जवळचे संबंध होते. महिला कॉन्स्टेबलशी ही वाढती जवळीक त्यांच्या मृत्यूचे कारण असू शकते, असा संशय आहे.
याप्रकरणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 14 मार्च 2024 रोजी महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा यांची कोंच पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली होती. 5 जुलै 2024 ला अरुण कुमार राय यांनी कोंच पोलिस ठाण्याचे इन्स्पेक्टर इनचार्ज म्हणून पदभार स्विकारला. दोघेही सुमारे सात महिने एकाच पोलिस ठाण्यात एकत्र तैनात होते. या काळात, त्यांच्यातील जवळीक वाढल्याच्या अफवा तीव्र झाल्या. 22 फेब्रुवारी 2025 ला अरुण यांची ओराई पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली, तर मीनाक्षीला 28 एप्रिल 2025 रोजी यूपी 112 युनिट- 1577 येथे पाठवण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण हे ओराईला गेल्यानंतर मीनाक्षीचे वर्तन बदलले. ती अरुण यांच्यावर विविध मुद्द्यांवरून सतत दबाव आणत होती. ती त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन वाद घालत असे, ज्यामुळे अरुण तणावात होते. सततचा ताण, संघर्ष आणि दबाव यामुळे अरुण कुमार राय यांच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असंही सांगण्यात येत आहे.
या खळबळजनक घटनेत, मृत इन्स्पेक्टरची पत्नी माया राय यांनी महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की मीनाक्षीच्या कॉल डिटेल्स आणि चॅट्समुळे अनेक गुपिते उलगडू शकतात. महिला कॉन्स्टेबल आणि स्टेशन इन्चार्ज यांच्यातील मोबाईल फोनवरील संभाषणाची नोंद देखील सापडली आहे. इतकंच नाही तर घटनेच्या काही काळापूर्वी, महिला कॉन्स्टेबलने तिची वर्दी मागण्यासाठी अरुण यांना फोन केला होता, माझी वर्दी द्या, मला घरी जायचे आहे, असं ती म्हणाली होती, अशीही माहिती आहे. घटनास्थळावरून एक पत्रही सापडले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.