जगातील सर्वात दुर्दैवी गाणं ज्याने घेतलेत 100 हून अधिक लोकांचे जीव; 62 वर्षांनंतर हटवली बंदी पण चुकूनही कधी ऐकू नका
गाणी ही कोणत्याही चित्रपटाचे प्राण असतात. अनेक चित्रपट केवळ त्यांच्या संगीत आणि गाण्यांच्या जोरावर हिट झाले आहेत. आनंदात आणि दुःखातही लोक चित्रपटातील गाणी ऐकून आपला मूड रिफ्रेश, हलका करतात. कोणते काम जरी करायचे असले तरी आपण गाणं
ऐकत ऐकत ते काम करायला पाहतो. गाणी आपल्याला ऊर्जा देतात आणि कोणत्याही
गोष्टीत आपल्याला रामावण्याचे काम करतात. काही गाणी अशी असतात जी लोकांना
एखाद्याची आठवण करून देतात आणि त्यांच्या जखमा भरून काढतात. काही गाणी अशी
आहेत जी वेदना कमी करतात. पण एक गाणं असं आहे जे प्रत्येक प्रकारे दुःख
देते.
जगात हॅपी आणि सॅड अशा दोन्हीही
प्रकराची गाणी बनवली जातात. लोक फार आवडीने ही गाणी ऐकतात आणि स्वतःला त्या
गाण्यांशी एकरूप करतात. मात्र तुम्हाला माहिती जगात एक असेही गाणे आहे
ज्याला जगातील सर्वात दुर्दैवी गाण्याचा किताब देण्यात आला आहे. असे म्हटले
जाते की, या गाण्याने आजवर १०० हुन अधिक लोकांचे जीव घेत आहेत. चला
याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
गाण्याचे कसा घेतला लोकांचा जीव?
आता अनेकांना असा प्रश्न पडेल की, एखादं गाणं कोणाचा जीव कसा घेऊ शकतो. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, वास्तविक हे गाणं ऐकल्यानंतर लोक आत्महत्या करतात. हाऊस स्टफ वर्क वेबसाइटनुसार, ग्लूमी संडे हे गाणे जगातील सर्वात दुर्दैवी गाणे आहे. हे गाणे रेझसो सेरेस आणि लास्झलो यांनी लिहिले आहे. १९३३ मध्ये लिहिलेले हे गाणे १९३५ मध्ये रिलीज झाले होते. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, त्याच वर्षी एका माणसाने ते ऐकल्यानंतर त्याने आत्महत्या केली. या व्यक्तीने त्याच्या सुसाईड नोटमध्ये या गाण्याचा उल्लेख केला होता. त्याच वेळी, असे म्हटले जाते की या गाण्याचे जे संगीतकार होते त्यांच्या मंगेतरनेही विष पिऊन आत्महत्या केली. १९६८ मध्ये, या गाण्याचे लेखक रेझसो यांनी देखील आत्महत्या केली. गाणे ऐकल्यानंतर दोन जणांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि एका महिलेने पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. या सर्व घटना वाढत चालल्या होत्या ज्यांनंतर या गाण्यावर बंदी घालण्यात आली.जेव्हा या गाण्याचे विश्लेषण केले गेले तेव्हा असे आढळून आले की, हे एक हंगेरियन सॉंग आहे. ज्या वेळी हे गाणे रिलीज झाले तेव्हा हंगेरीतील बहुतेक लोक तणावाने ग्रस्त होते. लोक आर्थिक संकटाचा सामना करत होते आणि त्यांना त्यांच्या कंपन्यांमधून काढून टाकले जात होते. अशा परिस्थितीत, या गाण्याचे बोल आणि चित्रीकरण त्याच्या आयुष्याशी जुळू लागले आणि यामुळे त्याला आणखी दुःख झाले. हे गाण्यामध्ये मानवतेबद्दल, जीवनातील धावपळीबद्दल, त्यात गुंतलेल्या दैनंदिन दुःखांबद्दल आणि मृत्यूबद्दल सांगितले गेले आहे.
टीप - आम्ही वाचकांपर्यंत माहिती पुरवण्यासाठी हा लेख लिहीत आहोत, याबाबत आमचे कोणतेही मत किंवा दावा नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.