कोणत्याही अटी शर्ती नाहीत, राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर...; संजय राऊतांनी आणखी एक मनसे पाऊल टाकलं
मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का? यावर राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा होत
असते. अलीकडेच, या चर्चेला नवे बळ मिळाले आहे. कारण दोघांनीही याबाबत एकेक
पाऊल पुढे टाकले आहे. एका मुलाखतीदरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसमोर
टाळीसाठी हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनीही तत्काळ त्याला सकारात्मक
प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना
उधाण आले आहे. आता याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी
मोठं वक्तव्य केलंय.
संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद सुद्धा महाराष्ट्र हितासाठी आहे. आता यात अटीशर्ती वगैरे कुठे आलेल्या नाही. दोन प्रमुख नेते जे भाऊ आहेत ते महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायच्या विषयावर त्यांची सहमती होत असेल तर त्यात फार वादविवाद करणे योग्य नाही. या मताचा माझासारखा माणूस सुद्धा आहे. यात अटी आणि शर्ती कोणत्याच नाही.
ही अट नाही तर लोकभावना
राज
ठाकरेंचं म्हणणं आहे की, महाराष्ट्र हितासाठी. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं
आहे की, महाराष्ट्र हितासाठी. प्रश्न इतकाच आहे की, महाराष्ट्र हिताच्या
फॉर्म्युल्यात भारतीय जनता पक्ष बसत नाही. भारतीय जनता पक्षासोबत आज जे लोक
आहेत ते बसत नाही. ही अट नाही तर लोकभावना आहे. याला कोणी अट आणि शर्त
म्हणत असेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणे गरजेचे आहे. विषय
महाराष्ट्राच्या भावनेचा आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की, आम्ही महाराष्ट्र
हितासाठी काम करायला तयार आहोत.
कुठलीही अट आणि शर्त टाकलेली नाही
संजय राऊत पुढे म्हणाले की, माझ्यासारख्या माणसाने बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. राज ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. मी राज आणि उद्धव यांच्यासोबत देखील एकत्र काम केले आहे. महाराष्ट्र हित हाच आमचा स्वाभिमान आहे. जे एक ध्येय गाठण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ते ध्येय काय होते? महाराष्ट्र, मराठी माणूस आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं, ही त्यांची भूमिका होती. आता मतभेदाचे जोडे बाहेर काढून या संदर्भात काम करणारे लोक एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत केलेले आहे. कुठलीही अट आणि शर्त टाकलेली नाही. महाराष्ट्र हिताला प्राधान्य द्या आणि जे महाराष्ट्र हिताचे शत्रू आहेत, त्यांच्या पंगतीलाही बसू नका, यात कुठली अत आणि शर्त नाही, अजिबात नाही, असे त्यांनी म्हटले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.