सिंधुदुर्ग : ठाकरे आणि राणेंमधील राजकीय वाद आता खाण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. कारण, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पण, उद्धव ठाकरे कोकणात आले की कोंबडी वडे, मासे बंद ठेवायचे, असे आदेश नारायण राणे यांनी हॉटेल चालकांना दिले आहेत.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी कोकणाला काय दिले?
असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. नारायण राणे म्हणाले, "उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना कोकणाला काही दिले नाही. अडीच वर्षात त्यांनी दिलेल्या पैशांची आकडेवारी जरा पाहा… त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याल्या किती पैसे दिले? ठाकरेंना कोकणावर बोलायचा काहीही अधिकार नाही. कोकणात येण्याचाही त्यांना अधिकार नाही."
कोंबडी वडे अन् मासे बंद ठेवायचे
"उद्धव
ठाकरे ज्यादिवशी कोकणात येतील, त्यादिवशी कोंबडी वडे आणि मासे बंद
ठेवायचे, असे आदेश मी हॉटेल चालकांना दिले आहेत. दुसरे काही करत नाहीत,
तेवढेच खायला कोकणात येतात," असे म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवर निशाणा
साधला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.