महाराष्ट्र राज्यात मालमत्ता आणि इतर दस्तऐवजांची नोंदणी करणे आता आणखी महाग झाले आहे. राज्य सरकारने नोंदणी मुद्रांक शुल्क विभागामार्फत आकारल्या जाणाऱ्या दस्त हाताळणी शुल्कात प्रति पान २० रुपयांवरून थेट ४० रुपये अशी दुप्पट वाढ केली आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे
दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या कागदपत्रांच्या स्कॅनिंग आणि हाताळणीसाठी
यापूर्वी प्रति पान २० रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, राज्य शासनाने
आता या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, नवीन दर प्रति पान ४०
रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक
नियंत्रक कार्यालयाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे घर खरेदीदार आणि इतर मालमत्ता व्यवहार करणाऱ्या नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. नुकतीच नोंदणी शुल्कात वाढ झालेली असताना, हाताळणी शुल्कातही वाढ का करण्यात आली, असा प्रश्न 'असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स'ने उपस्थित केला आहे.नोंदणी मुद्रांक विभागाच्या म्हणण्यानुसार, वाढलेली उपनिबंधक कार्यालये, संगणकीकरणाचा वाढता व्याप, ३५ विविध प्रणाली, सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्क देखभाल खर्चामुळे विभागाचा परिचालन खर्च वाढला आहे. कुशल मनुष्यबळावरील खर्चही वाढला आहे, त्यामुळे ही शुल्कवाढ करण्यात आल्याचे संकेत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.