दोन आठवड्यापूर्वी लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य हनीमूनसाठी शिलाँगला गेलं होतं. मात्र तिथून २४ मे पासून बेपत्ता झालं आहे. दोघांचं शेवटचं लोकेशन शिलाँगमधील ओसरा हिल इथं होतं. त्याठिकाणी त्यांनी भाड्याने घेतलेली एक्टिव्हा बेवारस स्थितीत आढळून आली. इंदौरच्या नवविवाहित दाम्पत्याचं नाव
राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी असं आहे. इंदौरहून ते २० मे रोजी शिलाँगला
गेले होते. आता राजा आणि सोनम यांचे नातेवाईक शिलाँगला पोहोचले असून
दोघांचा शोध घेतला जात आहे.
इंदौरमधील राजा रघुवंशी यांचं ११ मे रोजी सोनमसोबत लग्न झालं. त्यानंतर २० मे रोजी ते इंदौरहून गुवाहाटीला गेले. तिथं कामाख्या देवीच्या दर्शनानंतर २३ मे रोजी शिलाँगला गेले. शिलाँगला गेल्यानंतर सुरुवातीला ते कुटुंबियांच्या संपर्कात होते. मात्र २३ मे पासून संपर्क तुटला. राजा रघुवंशी यांचे मोठे भाऊ सचिन रघुवंशी यांना सुरुवातीला नेटवर्कची अडचण असेल असं वाटलं. पण २४ मे पासून दोघांचे मोबाईल बंद आढळले. यामुळे कुटुंबियांना चिंता वाटू लागली. शेवटी सोनमचा भाऊ गोविंद आणि राजा यांचा भाऊ विपिन शिलाँगला पोहोचले.गूगल मॅप आणि त्यांच्या फोटोंच्या माध्यमातून लोकेशन ट्रेस केलं तेव्हा त्यांनी भाड्यानं एक्टिव्हा घेतल्याचं समजलं. एक्टिव्हाने ओसरा हिलच्या दिशेनं दोघे गेले होते अशी माहिती समोर आली. पण ती एक्टिव्हा एका ठिकाणी बेवारस अवस्थेत आढळली. शिलाँग पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलीसही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. स्थानिक सीसीटीव्ही फूटेज चेक केलं जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.