भारतात दुचाकी हा प्रवासाचा सच्चा मित्र मानल्या जातो. कंपनीत जाणे असो वा नोकरीच्या ठिकाणी जायचे असो, अनेकजण दुचाकीला पसंती देतात. पण रोजच्या वापरात तिची निगा राखणं पण गरजेचं असतं. जर बाईकचं इंजिन वेळेत बदलवं नाही तर पुढे गाडीचं काम वाढून मोठा भूर्दंड बसू शकतो. आर्थिक फटका बसल्याने तुमचेच नुकसान होऊ शकते. त्यामुळे इंजिन ऑईल बदल करण्यात हलगर्जीपणा करू नये.
प्रत्येक दुचाकी कंपनी, ग्राहकाला याविषयीचे एक मॅन्युअल बुक देते. त्यात बाईकची सर्व्हिसिंग, तिची निगा. टायरची लाईफ, इंजिन तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या टिप्स यांची माहिती दिली जाते. त्यात इंजिन ऑईल कधी बदलायला हवे याची माहिती देण्यात येते. बाईक चालवतान ती जास्त आवाज करत असेल तर इंजिन ऑईल खराब झाल्याचे हे संकेत आहेत. नवीन इंजिन ऑईल टाकल्यावर इंजिनाचा गोंगाट कमी होतो. तर जुने आणि जळालेले इंजिन ऑईलमुळे बाईक जास्त आवाज करते. बाईक जास्त गरम होत असेल तर इंजिन ऑईल बदलण्याची वेळ आली असे मानल्या जाते. अथवा ऑईलची क्वालिटी घसरली. ऑईलची पातळी कमी झाली तर इंजिनला मोठा फटका बसू शकतो. अनेक कंपन्या ठराविक किलोमीटर नंतर इंजिन ऑईल बदलण्याचा सल्ला देतात. पण तुमचा रोजचा वापर. सतत गिअर बदल यावर इंजिन ऑईल बदलण्याची आवश्यकता समोर येते. बाईक जास्त गरम होत असेल आवाज येत असेल, ऑईलची पातळी कमी झाली असेल तर ऑईल बदल नक्की करा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.