महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रगत दिशा देणारे वसंतदादा पाटील यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला वेगळे वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणून वसंतदादा पाटील यांची ओळख आहे.
आजच्या दिवशी 1917 रोजी त्यांचा सांगलीमध्ये जन्म झाला. मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात वसंतराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. आजही त्यांचे कार्य राजकीय नेत्यांना प्रेरणा देतेय.
13 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1841 : जेम्स ब्रॅडी यांना प्राण्यांच्या मोहामुळे संमोहनाचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळाली.1864 : ग्रीस देशाने नवीन संविधान स्वीकारले1913 : रवींद्रनाथ टागोर यांना त्यांच्या गीतांजली या साहित्यासाठी स्वीडिश अकादमीने साहित्यातील नोबेल पारितोषिक प्रदान केले.1921 : वामनराव पटवर्धन यांनी पुढाकार घेऊन पुण्यात अखिल भोर संस्थान प्रजा सभेची स्थापना केली.1931 : शंकर रामचंद्र आणि मामाराव दाते यांनी देवनागरी लिपी एका मोनोटाइप मशीनवर यशस्वीरित्या स्थापित केली.1989 : हंस-ॲडम II, सध्याचा लिक्टेनस्टीनचा राजकुमार, त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची कारकीर्द सुरू झाली1994 : एका सार्वमतामध्ये, स्वीडनमधील मतदारांनी युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.1995 : पूर्वीच्या ब्रिटीश साम्राज्याचा भाग न होता राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये सामील होणारे मोझांबिक हे पहिले राज्य बनले.2002 : इराक निशस्त्रीकरण संकट : इराक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठराव 1441 च्या अटींशी सहमत.2012 : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण प्रशांत महासागराच्या काही भागात पूर्ण सूर्यग्रहण झाले.2013 : 4 वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे उघडले.
13 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष
1780 : 'रणजितसिंग' - शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा यांचा जन्म. (मृत्यू : 27 जून 1839)
1850 : 'आर. एल. स्टीव्हनसन' - इंग्लिश लेखक व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 3 डिसेंबर 1894)
1855 : 'गोविंद बल्लाळ देवल' - आद्य मराठी नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 14 जून 1916)
1873 : 'बॅ. मुकुंद रामराव जयकर' - कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू यांचा जन्म. (मृत्यू : 10 मार्च 1959)
1898 : 'इस्कंदर मिर्झा' - पाकिस्तानचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 13 नोव्हेंबर 1969)
1917 : 'वसंतदादा पाटील' - महाराष्ट्राचे 5 वे व 9 वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 1 मार्च 1989)
1917 : 'गजानन माधव मुक्तिबोध' - हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक यांचा जन्म. (मृत्यू : 11 सप्टेंबर 1964)
1954 : 'स्कॉट मॅकनीली' - सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.
1967 : 'जूही चावला' - अभिनेत्री यांचा जन्म.
13 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष
1740 : 'कृष्णदयार्णव' - प्राचीन मराठी कवी यांचे निधन.1956 : 'इंदुभूषण बॅनर्जी' - शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 1 नोव्हेंबर 1893)2001 : 'सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी' - ज्येष्ठ लेखिका यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1917)2002 : 'ऋषिकेश साहा' - नेपाळी लेखक, राजकारणी व मानवाधिकार कार्यकर्ते यांचे निधन.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.