Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"सुनेत्रावहिनींना सांगितलं आहे, मनात किंतू-परंतू बाळगू नका, आम्ही."; जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय?

"सुनेत्रावहिनींना सांगितलं आहे, मनात किंतू-परंतू बाळगू नका, आम्ही."; जयंत पाटील यांनी नेमकं काय म्हटलंय?
 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. ज्यामुळे सगळा महाराष्ट्र हळहळला. दरम्यान अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर तीन दिवसांनी म्हणजेच ३१ जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांचं विलीनकरण होईल अशा चर्चांनाही अजित पवारांच्या निधनानंतर उधाण आलं होतं. अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांनी आम्ही एनडीएसह आहोत आणि विलीनीकरणाची चर्चा झाली नव्हती असं म्हटलं आहे. दरम्यान मागचे काही दिवस या सगळ्या घडामोडी घडत असताना जयंत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

 
विलीनीकरणावर सध्या चर्चा नको-जयंत पाटील
अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली होती. अजित पवार त्यासाठी आग्रही होते, असा दावा वारंवार शरद पवार गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, अजित पवार गटाच्या प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नव्हती, असे सांगत हा दावा फेटाळून लावला होता. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचे घोडे अद्याप अडले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सुनेत्रा पवारांना अडथळे निर्माण करणार नाही असं म्हटलं आहे. तसंच विलीनीकरणावर चर्चा नको आम्ही ज्यांच्याशी चर्चा केली तेच (अजित पवार) आता नाहीत असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
सुनेत्रा पवार यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणार नाही-जयंत पाटील

राजकारणात उद्या काय होईल हे आज सांगता येत नाही. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर हे पुन्हा सिद्ध झालं आहे. आजचा दिवस उद्या आहे का? हे नियतीला मान्य आहे का? शरद पवार हे आमचं नेतृत्व करत आहेत. शेतकऱ्यांच्या समोर काही आव्हानं निर्माण होणार आहे. देशाच्या आर्थिक स्थितीचे बरेच प्रश्न आहेत. आमचा पक्ष त्या अनुषंगाने विचार करेल. विलीनीकरणाबाबत काही भाष्य करावं असं मला वाटत नाही. ज्यांच्याशी आमची चर्चा झाल्याने कुणी काय बोललं त्यावर काय उत्तर देणार? सुनेत्रा वहिनींना आम्ही चार ते पाच जण जाऊन भेटलो. तुम्ही काहीही अडचण असेल तर आम्हाला सांगा. सुनेत्रा पवार असोत किंवा पार्थ पवार यांच्यासाठी अडथळे आणि प्रश्न निर्माण करण्याची इच्छा नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

शशिकांत शिंदेंचा दावा काय?
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लिहिलेल्या लेखातून विलिनीकरणाबाबत महत्त्वाचे भाष्य केले होते. १२ फेब्रुवारीला आम्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करणार होतो. विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे संपूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.