Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इराणला मोदींनी साथ द्यायला हवी होती; गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे असे का म्हणाले?

इराणला मोदींनी साथ द्यायला हवी होती; गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे असे का म्हणाले?



मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात इराण-इस्त्रायल युद्धावर मोठं भाष्य केलं. 'युद्धात मोदींनी इराणला साथ द्यायला हवी होती. खामेनेईंच्या मृत्यूनंतर भारताने सरकारनं कोणतंही विधान केलं नाही. इराणच्या मागे अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही. याचा त्रास भविष्यात निश्चित होईल, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शक्यता व्यक्त केली

मनसे पक्षाला २० वर्ष पूर्ण झाले आहेत. पक्षाला २० वर्ष पूर्ण झाल्यानंतर मनसे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. मनसेने पु्न्हा एकदा संघटन बांधणीवर लक्ष दिले आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पुन्हा सत्ता मिळवणार असल्याचे भाष्य केलं. यावेळी राज ठाकरेंनी इराण-इस्त्रायल युद्धावरून मोदी सरकारला सल्ला दिला.

राज ठाकरे म्हणाले, पुढील तीन वर्षे निवडणुका नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांकडून पैसे खायला सगळेच मोकळे आहेत. आज देशातही आहेत. धाकधूक सुरू आहे. भीषण परिस्थिती आहे. गॅस मिळत नाही. नेहमी नॉर्मलला असणारी लोक गॅसवर आहेत. खरं तर काही गोष्टी आपल्याकडून, पंतप्रधानांकडून राहून गेल्या, जो इराण इतकी वर्षे साथ देत नव्हता त्या इराणवर हल्ले होत आहेत. आपण इराणला साथ द्यायला हवी होती'.

'भारतात येणारं सगळं तेल हे इराणमधून येतं. ते आपल्याला रुपयात देतात. देत आले. पण खामेनेई गेल्यानंतरही भारताच्या पंतप्रधानांनी कुठलंही निषेधाचं स्टेटमेंट काढलं नाही. सरकार हल्ल्याविषयी काही बोलले नाही. त्याच्या मागे आपण अडचणीच्या काळात उभे राहिलो नाही. याचा त्रास भविष्यात निश्चित होईल. सगळ्या बाजूने समजतच नाही. नेमके आपण कुठे, काय चाललो आहोत. या देशातील राज्ये, लोक, प्रगती कुठे होतेय, गेल्या जानेवारीत सभा झाली त्यावेळी अनेकांचे वाभाडे काढले, आपणही किती अडाणी आहोत हे सांगितले, असे राज ठाकरे पुढे म्हणाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.