Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हनिमूनला गेलेलं आणखीन एक कपल सिक्किममधून गायब! १२ दिवसांपासून शोध सुरु.

हनिमूनला गेलेलं आणखीन एक कपल सिक्किममधून गायब! १२ दिवसांपासून शोध सुरु.
 

सध्या देशात इंदोरचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. लग्नानंतर हनिमूनसाठी गेलेल्या या कपलसोबत असा काही प्रकार घडला की देशभरात एकच खळबळ उडाली. इंदोरचा रहिवासी राजा रघुवंशी काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीसह मेघालय येथे फिरण्यासाठी गेला होता. मात्र, फिरायला गेलेला राजा परतलाच नाही. त्याचा मृतदेह पोलिसांना जंगलात सापडला. तर त्याची पत्नी सोनम ही बेपत्ता होती. दोन दिवसांनंतर सोनम उत्तर प्रदेश मधील एका धाब्यावर पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून, योगेशचा नेमका मृत्यू कसा झाला? याचा शोध सुरु आहे.

इंदोरच हे प्रकरण ताजे असतानाच आणखीन एक नवविवाहित जोडपे सिक्किमधून गायब झाल्याची बातमी समोर येत आहे. हे जोडपे सिक्कीमला हनिमूनसाठी गेले होते. मात्र, गेल्या 12 दिवसांपासून हे नवविवाहित जोडपे रहस्यमयरित्या बेपत्ता आहे. स्थानिक पोलीस तसेच बचाव पथक अनेक दिवसांपासून त्यांचा शोध घेत आहेत. मात्र, पोलिसांना तसेच बचाव पथकाला अजूनही यश मिळालेले नाही. पोलिसांनी अक्षरशः सिक्कीममधील एक न एक जागा शोधून काढली आहे. मात्र, तरीही पोलिसांना यश न आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कौशल्येंद्र प्रताप सिंह (२९) आणि अंकिता (२६) असे बेपत्ता झालेल्या जोडप्याचे नाव आहे. दोघांचे लग्न ५ मे रोजी झाले होते. तर २४ मे रोजी दोघेही हनिमूनसाठी सिक्कीमकडे निघाले. सिक्कीम फिरत असताना २९ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि गाडी सुमारे १००० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच सिक्कीम पोलीस आणि लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी पोहचले आणि शोधमोहीम सुरु केली. कौशल्येंद्र आणि अंकिता यांची गाडी तिस्ता नदीत गडप झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पण हा अपघात एक रहस्यमय अपघात होता ज्याने अनेक प्रश्न उपस्थित केले. या थरारक अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी सापडले पण सर्वात धक्कादायक म्हणजे, या अपघातात आठ पर्यटक बेपत्ता झाले! या बेपत्ता लोकांमध्ये प्रतापगडचे नवविवाहित जोडपे कौशल्येंद्र आणि अंकिता यांचाही समावेश आहे. बचाव पथक आणि पोलीस बेपत्ता लोकांचा दिवसरात्र शोध घेत आहेत पण पोलिसांना कोणतेच यश मिळत नाहीये, अशातच या बेपत्ता लोकांना सिक्कीमच्या दऱ्यांनी गिळून टाकले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.