सांगली, दि.१४: येथील यशवंतनगर मधील ऋतुजा सुकुमार राजगे या तरुण विवाहितेने धर्मांतरासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून ऋतुजा राजगे हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या सर्वांना कठोरात कठोर शासन व्हावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली. आमदार गाडगीळ यांनी शनिवारी ऋतुजा राजगे हिच्या गुंडेवाडी येथील माहेरी भेट दिली. तिचे वडील चंद्रकांत पाटील आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.
आमदार गाडगीळ म्हणाले, ऋतुजा राजगे हिला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्र्यांची तातडीने भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहे. ऋतुजाच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या सर्वांना कठोर शासन व्हावे. यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत अशी ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे.ऋतुजा सुकुमार राजगे M.Sc झालेल्या उच्चशिक्षित महिलेने सासरच्या सततच्या होणाऱ्या ख्रिश्चन धर्मांतरणाच्या त्रासाला व जाचाला कंटाळून दिनांक ६ जून रोजी गळफास लावून आत्महत्या केली. ऋतुजा ही सात महिन्यांची गर्भवती होती. २०२१ मध्ये सुकुमार राजगे व ऋतुजा यांचा विवाह झाला होता. या विवाहाच्या वेळी राजगे कुटुंबांनी "आम्ही हिंदू धनगर आहोत" असे सांगितले होते.
विवाहनंतर काही दिवसातच राजगे कुटुंब ख्रिश्चन आहे, हे ऋतुजा व माहेरच्या मंडळींच्या लक्षात आले. तरीही ऋतुजा या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपला संसार करीत होती. पण नवरा सुकुमार राजगे, सासरा सुरेश राजगे व सासू अलका राजगे यांनी ऋतुजा हिला" ख्रिश्चन धर्माचा स्वीकार कर, तुझ्या देवांना नमस्कार करणे बंद कर असं म्हणून तिला त्रास द्यायला सुरुवात केली, बऱ्याचदा तिला चर्चमध्ये घेऊन गेले व तिथे धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीही केली. चर्च मधील धर्मगुरूंनीही तिच्यावर धर्मांतरासाठी सक्ती करायचा प्रयत्न केला अशी तक्रार आहे. यावेळी ह्यांच्या सोबत आमदार गाडगीळ
भाजपा शहरजिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, अनुसूचित मोर्चा प्रदेश सचिव प्रदीप
कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, विजय साळुंखे, मंडल अध्यक्ष संतोष
सरगर आदी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.