देशातील बँकिंग क्षेत्रासंबंधित नवीन धोरण बनवण्याचे अधिकार RBI ला आहे. Reserve Bank of India ने बँकिंग क्षेत्रासंबंधित नवीन निर्णय जाहीर केला होता. हा नियम बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेसंबंधित आहे. एखादी मालमत्ता बँकेकडे वर्षोनुवर्षे पडून राहू नये तसेच या मालमत्तेच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून RBI ने महत्वाचे नियम आणले आहेत. हे नियम कर्ज बुडवणाऱ्यांसाठी एक धोक्याची घंटा आहे. कारण RBI च्या नव्या नियमांमुळे कर्ज बुडवणे या विषयासंबंधित धोरणे आणखीन कठोर झाले आहेत.
जर बँकेने एखादी मालमत्ता जप्त केली असेल, तर बँकेला ती फक्त 7 वर्षांसाठीच ठेवता येईल. त्यानंतर ती मालमत्ता विकावी लागेल. बँकेने मालमत्ता विकण्यासाठी काढली तर घेण्यात येणारा लिलाव हा फक्त सार्वजनिक स्वरूपाचा असावा. एकंदरीत, जप्त मालमत्ता विकण्यासाठी बँकेला पब्लिक ऑक्शन करावे लागणार आहे.
कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला त्याची मालमत्ता पूर्णपणे विसरावी लागणार आहे कारण त्याला किंवा त्याच्या कुटुंबियांना ही मालमत्ता पुन्हा खरेदी करता येणार नाही. बँकांना जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्यांकन किमान दोन स्वतंत्र मूल्यांकनकर्त्यांकडून करणे बंधनकारक आहे. जगभरात अनेक लोकं आर्थिक गरजेसाठी बँकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना त्यांच्या मालकीच्या काही गोष्टी बँकांकडे गहाण ठेवली जातात. त्या गोष्टी जमीन, दुकान, घर, गाडी किंवा इतर कोणतीही मालमत्ता असू शकते. कर्ज बँकांना परत करण्याची एक ठराविक मुदत दिली जाते. जर कर्ज घेणारा या वेळेत कर्ज परत करण्यात असमर्थ ठरला. तर त्याने गहाण ठेवलेली मालमत्ता पूर्णपणे बँकेच्या मालकीची होते आणि त्या मालमत्तेला विकण्याचा पूर्ण अधिकार संबंधित बँकेकडे असतो.
RBI च्या नव्या नियमावलीनुसार, बँकेकडून जप्त करण्यात आलेली ती मालमत्ता बँकेला 7 वर्षांच्या आत विकावी लागेल. जप्त करण्यात आलेली मालमत्ता पुन्हा कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला विकली जाऊ शकत नाही. तसेच त्या व्यक्ती संबंधित असणाऱ्या लोकांनाही मालमत्ता विकण्यास मनाई आहे. या गोष्टींची खबरदारी बँकांना घ्यावी लागणार आहे. बँक जप्त करण्यात आलेली मालमत्ता खाजगी लिलावाद्वारे विकू शकत नाही. जप्त मालमत्ता फक्त पब्लिक ऑक्शनद्वारेच विकली गेली पाहिजे. RBI च्या या नव्या नियमांमुळे जप्त मालमत्ता विकण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे. तसेच कर्जवसुली करण्याची प्रक्रिया RBI च्या या नियमांमुळे सामान्य माणसांवर होणार परिणाम असा आहे की जर एखाद्या व्यक्तीचे कर्ज थकले तर निश्चितच मालमत्ता जप्त केली जाईल पण त्या मालमत्तेची विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शकतेने होईल. पण, कर्ज बुडवणाऱ्या व्यक्तीला ती मालमत्ता पुन्हा विकत घेण्याची संधी मिळणार नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.