मोठंमोठे सेलेब्रिटीही आहारात करतात ABC ज्यूसचा समावेश; त्वचेच्या अनेक समस्या करते दूर; पिण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
मागील काही काळापासून एबीसी ज्यूसचा ट्रेंड फार वाढत आहे. मोठमोठ्या सेलेब्रिटींपासून ते आरोग्य तज्ञांपर्यंत सर्वच या ज्यूसचे सेवन करण्याचा सल्ला करतात. हे एक आरोग्यदायी पेय असून गाजर, बीट
आणि आवळ्यापासून ते तयार केले जाते. भाज्यांचे हे रस आरोग्यासाठी अतिशय
उपयुक्त ठरते. गाजर, बिट आणि आवळा यांना एकत्रितपणे पिणे शरीरासाठी एक
प्रकारचा नैसर्गिक टॉनिकप्रमाणेच आहे. या तिघांचे मिश्रण केवळ चवीलाच
चांगलं नसून, आरोग्यदृष्ट्याही अत्यंत लाभदायक असतं. गाजरात बीटा-कॅरोटीन,
फायबर, व्हिटॅमिन ए, सी आणि के हे घटक भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांचं
आरोग्य सुधारण्यात, त्वचा उजळवण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत
करतात.
बीटरूटमध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम
आणि नायट्रेट्स असतात, जे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतात, रक्तदाब नियंत्रित
ठेवतात आणि थकवा कमी करतात. बीटरूटचा रस विशेषतः हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी
आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त ठरतो. बीटरूटचे
नियमितपणे सेवन केल्यास अशक्तपणा दूर होतो आणि उर्जा पातळी वाढते. आवळा हा
आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. तो व्हिटॅमिन सी चा अत्यंत
समृद्ध स्रोत असून, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
आवळ्याचे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना नुकसानीपासून वाचवतात आणि
पचनतंत्र मजबूत करतात.
ABC ज्यूसचे फायदे आणि तयार करण्याची योग्य पद्धत
गाजर, बीट आणि आवळा यांचा एकत्रित रस तयार केल्यास तो एक अत्यंत प्रभावी आरोग्यदायी पेय ठरतो. या रसामध्ये असलेले पोषक घटक शरीरातील विविध आवश्यक कार्यांसाठी मदत करतात. यामध्ये हाडं मजबूत होणे, त्वचा तजेलदार दिसणे, केसांची वाढ सुधारणे आणि शरीराला ऊर्जा मिळणे यांसारख्या अनेक फायदे मिळतात. या रसाचं नियमित सेवन केल्यास थकवा कमी होतो, शरीरात ताजेपणा येतो आणि एकूणच आरोग्यदृष्ट्या सुधारणा होते.हा रस तयार करणे फार सोपे आहे. यासाठी प्रथम गाजर, बीटरूट आणि आवळा यांना चांगलं धुऊन, सोलून आणि लहान तुकडे करून मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यावं. तयार ज्यूस गाळू नका आणि तसेच याचे सेवन करा. तुम्ही यात तुम्हाला हवे असल्यास लिंबाचा रस किंवा मधही घालू शकता. दररोज सकाळी उपाशी पोटी हा रस प्यायल्यास शरीरासाठी तो अमृतासमान ठरतो. त्यामुळे या नैसर्गिक पेयाचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करून आरोग्य लाभ घेणं नक्कीच फायद्याचे ठरेल.
त्वचेचे आरोग्य सुधारते
बीटमध्ये
फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट नावाचे गुणधर्म असतात जे शरीरातील
आतड्यांचे आरोग्य सुधारते. गाजर, आवळा आणि बीटाचे एकत्रित सेवन केल्यास
शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि वाईट बॅक्टेरिया कमी होण्यास मदत
होते. या रसाचे नियमितपणे सेवन केलयास आतड्याचे आरोग्य सुधारते, परिणामी
त्वचेवरही नैसार्गिक निखार जाणवू लागतो. या भाज्यांमध्ये आढळणारे घटक
त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. या रसाचे सेवन संसर्गापासून
देखील आपले संरक्षण करतो. यामुळे अनेक आजारांपासून आपला बचाव होतो,
ज्यामुळे शरीर निरोगी राखण्यास मदत होते.
(टीप
- हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून सांगली दर्पण
कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही
उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.