कोल्हापूर : राज्यावर सात लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. जन्माला येणारे प्रत्येक मूल डोक्यावर कर्ज घेऊन येत आहे. आणखी वर्षभराने शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही याची शंका आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी येथे पत्रकार परिषदेत शनिवारी केली.ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी घोषणांचा धडाकाच लावला होता.
आता राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणे विसरा, उलट १५०० रुपयेही मिळण्याची शाश्वती राहिलेली नाही. राज्यातील शासन म्हणजे घर विकून दिवाळी साजरे करणारे आहे, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेगवेगळ्या सुरात बोलत असल्याने एकूण चित्र बेसूर झाले आहे. अजून मुख्यमंत्री असल्याच्या अविर्भावातच शिंदे यांचा वावर असतो.हिंदी विषयाच्या सक्तीने मराठीवर परिणाम होईल असे वाटत नाही. मुंबई महापालिका कॉंग्रेसने स्वतंत्रपणे लढवावी ही माझी भूमिका आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल मला आदर असला तरी त्यांना मुंबई-गोवा महामार्ग अनेक वर्षे पूर्ण करता आलेला नाही. दळणवळण प्रभावी असेल तर विकास होतो हे वास्तव असले तरी स्थानिक लोकभावना विचारात घेऊन निर्णय व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.