Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रात्री पार्ट्या, चूक झाल्यास विजेचे शॉक.; आश्रमातील मुलांच्या खुलाशाने खळबळ

रात्री पार्ट्या, चूक झाल्यास विजेचे शॉक.; आश्रमातील मुलांच्या खुलाशाने खळबळ



उल्हासनगर : जवळील खंडाळी येथील एका अनधिकृत बालक आश्रमात मुलांचा अमानुष छळ होत असल्याचा आणि निष्काळजीपणामुळे एका बालकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आश्रमाच्या संचालिका शोभा कुर्के यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आश्रमातून सुटका करण्यात आलेल्या मुलांनी बालकल्याण समितीसमोर आपली आपबीती कथन केली आहे. 


मुलांच्या म्हणण्यानुसार, आश्रमात चूक झाल्यास त्यांना विजेचे शॉक दिले जायचे आणि जबर मारहाण केली जायची. रात्रीच्या वेळी आश्रमात पार्त्या चालत आणि मुलांना दारू वाढण्यास भाग पाडले जात असे. आश्रमाची पाहणी केली असता तेथील धक्कादायक परिस्थिती समोर आली. आश्रमातील एकूण २० मुलांपैकी चार मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. संचालिका शोभा कुर्के या गेल्या १६ वर्षांपासून हा आश्रम चालवत होत्या आणि शासकीय मदतही मिळवत होत्या, असे समोर आले आहे.

 

आश्रमातील एका बालकाचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यानंतर हे गंभीर प्रकरण उजेडात आले. यानंतर प्रशासनाने कारवाई करत संचालिका शोभा कुर्के यांच्यासह पाच जणांवर गुन्हा नोंदवला आहे. आश्रमातील मुलांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आश्रमातून सुटका झालेल्या एका १६ वर्षीय मुलीने- राधाबाई आप्पाराव चापरी) आश्रमातून काही मुलांची विक्री झाल्याचा संशय व्यक्त केला आहे, ज्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. पोलीस या सर्व आरोपांचा सखोल तपास करत आहेत. 




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.