बीड : बीड जिल्हा रुग्णालयात प्रसूती दरम्यान मातेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्हा रुग्णालयात आलेल्या छाया पांचाळ
यांची प्रसूती व्यवस्थित करण्यासाठी रुग्णालयातील परिचालिकाकडून पैशाची
मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांनी कुटुंबीयांच्याकडून दोन हजार
रुपये घेतले पण पेशंटवर उपचार केले नाहीत. नॉर्मल प्रसूती झाल्यानंतर
महिलेला अतिरक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर डॉक्टरांनी रक्त तपासणीसाठी
पाठवले व त्यानंतर रक्ताची पिशवी मागवली.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दिरंगाई झाली आणि त्याच कालावधीत मृत्यू झाला. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर आणि नर्स यांनी वेळेवर उपचार केले नाहीत, तसेच रक्ताची पिशवी आणायला उशीरा सांगितलं असा आरोप आता नातेवाईकांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा बळी गेल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पेशंट इतका गंभीर असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना बाहेरून रक्त आणायला का सांगितले..? नॉर्मल डिलिव्हरीमध्ये रक्तस्त्राव झाला कसा ? यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.