निवडणुका जाहीर करण्याआधी ममता बॅनर्जींनी डाव फिरवला, केली सर्वात मोठी घोषणा; विरोधकांच्या गोटात अस्वस्थता
कोलकाता: निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, राज्यातील पुरोहित आणि मुअज्जिन यांना दिल्या जाणाऱ्या मासिक मानधनात 500 ची वाढ करण्यात आली आहे.
या बदलानंतर त्यांना आता दरमहा 2,000 मानधन मिळणार आहे. ममता बनर्जी म्हणाल्या की, या दोन्ही घटकांची सेवा समाजाच्या आध्यात्मिक आणि सामाजिक जीवनाला आधार देणारी आहे.
विशेष म्हणजे घोषणा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडून पश्चिम बंगालसह तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याच्या काही तास आधी केली आहे. या पाचही विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत असल्याने आजच्या पत्रकार परिषदेनंतर आचारसंहिता लागू होणार असून एप्रिल-मे दरम्यान निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
2021 मध्ये या पाचही राज्यांच्या निवडणुकांची घोषणा 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्या वेळी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. 2021 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 7 मे, तमिळनाडूचा 10 मे, आसामचा 20 मे आणि केरळ विधानसभेचा कार्यकाळ 23 मे रोजी संपला होता. तर पुडुचेरी विधानसभेचा कार्यकाळ सर्वांत शेवटी म्हणजे 15 जून रोजी संपत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.