इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. गेल्या 10 दिवसांमध्ये आता चाैथ्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. नव्या किमती आज सकाळपासून देशभरात लागू करण्यात आल्या. हा सर्वसामान्य नागरिकांकरिता मोठा दणका म्हणावा लागेल.
सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. इराण युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने ऊर्जेचा तुटवडा आहे. पूर्ण साखळीच विस्कळीत झाली. शिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सतत मोठी वाढ होत आहे. त्याचाच हा परिणाम भारतात बघायल मिळतोय. देशभरात आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. 25 मे 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून पेट्रोलच्या दरात 2.61 रूपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.71 ने वाढ झाली आहे.
गेल्या दहा दिवसांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमधील ही चाैथी वाढ आहे. जर इराण आणि अमेरिका युद्ध थांबलेच नाही तर किमतीमध्ये अशीच वाढ होईल. महागाई वाढत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करत म्हटले होते की, नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलचा व्यवस्थित वापर करून काटकसरीने वापरावे. शिवाय विदेश यात्रा टाळण्याचेही आवाहन केले होते.
होर्मुज खाडी बंद असल्याने तेल पुरवठा होण्यास समस्या येत आहे. शिवाय आखाती देशात युद्धाचे ढग असल्याने रिफानरीवरही ताण आहे. अनेक देशात लॉकडाऊनही स्थिती आहे. परकिय चलणावरील दबाव कमी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने पुढील 1 वर्षाकरिता खरेदी न करण्याचे आवाहन केले. शिवाय एलपीजी गॅसचाही मोठा तुटवडा आहे.
इराण आणि अमेरिका युद्धाची मोठी झळ भारताला बसताना दिसत आहे. परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. यादरम्यान भारताचे अनेक मित्र भारताच्या मदतीला धावले आहेत. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणवर आता जगाचा दबाव वाढू लागला आहे. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात हे युद्ध असली तरीही संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.