Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चिंता वाढली! देशात मान्सूनचा ब्रेक, सॅटेलाईट फोटोंनी उडवली झोप; पाऊस ६४ टक्क्यांनी घटला

चिंता वाढली! देशात मान्सूनचा ब्रेक, सॅटेलाईट फोटोंनी उडवली झोप; पाऊस ६४ टक्क्यांनी घटला


कोकणात आल्यानंतर थांबलेल्या मान्सूनमध्ये प्रगती होण्याची आशा असतानाच सॅटेलाईटने टिपलेल्या छायाचित्रांनी काहीसी चिंता वाढवली आहे. उपग्रहाच्या फोटोंमध्ये मान्सून भारतातून पूर्णपणे गायब झाल्यासारखा दिसत आहे. देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात मोसमी पाऊस पोहोचल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पावसाच्या गतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, ४ जून ते १५ जून दरम्यान भारतामध्ये सरासरी ५३.७ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ १९.२ मिमी इतकाच पाऊस झाला आहे, म्हणजेच देशभरात पावसाची ६४ टक्के घट नोंदवली गेली आहे.

पाऊस गायब, सॅटेलाईट फोटो का चिंता वाढवणारे?

मान्सूनच्या हालचालींबद्दल सॅटेलाईटने टिपलेल्या दृश्यांमध्ये चिंताजनक चित्र दिसत आहे. यामध्ये मध्य, दक्षिण आणि पूर्व भारताचा मोठा भाग पिवळ्या आणि लाल रंगात दिसत आहे; हे रंग कमी ते अत्यंत कमी पावसाचे संकेत देतात.
१५ जून रोजी 'इन्सॅट-३डीएस' (INSAT-3DS) या उपग्रहाने टिपलेल्या फोटोंमध्ये ही परिस्थिती अधिकच स्पष्टपणे समोर आली आहे.

सक्रिय मान्सूनशी संबंधित असलेला ढगांचा मोठा थर दिसण्याऐवजी, बहुतांश द्वीपकल्पीय आणि मध्य भारतात आकाश असामान्यपणे निरभ्र दिसत आहे.

ढगांची मुख्य हालचाल हिमालय, ईशान्य भारत आणि इंडो-गंगेच्या खोऱ्यात उत्तरेकडील भागांवर केंद्रित झाली आहे. दुसरीकडे अरबी समुद्रातील मान्सूनची शाखाही कमकुवत आणि विखुरलेली दिसत आहे.
२०२६ मध्ये मान्सूनला भारतात पसरण्यासाठी संघर्ष का करावा लागतोय?

मागील काही दिवसांमध्ये मान्सूनने कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या काही भागांत प्रगती केली असली, तरी हा वेग चिंता वाढावी इतका मंदावला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, मूळ कारण आजूबाजूच्या समुद्रातील आर्द्रतेच्या कमतरतेची नसून, जमिनीपासून काही किलोमीटर वर (उच्च वातावरणात) सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील संघर्षाचे आहे.

या समस्येच्या केंद्रस्थानी 'वेस्टर्ली जेट स्ट्रीम' ज्याला मराठीमध्ये पश्चिमेकडून वाहणारा वेगवान वायू प्रवाह म्हणतात, तो आहे. उच्च वातावरणातील हा वेगाने वाहणारा हवेचा प्रवाह नेहमीपेक्षा खूपच दक्षिणेकडे सरकला आहे.
या असामान्य बदलामुळे 'ईस्टरली जेट'च्या सक्रिय होण्यात अडथळा येत आहे, जो भारतातील मान्सूनचे चक्र टिकवून ठेवण्यासाठी मुख्य इंजिन म्हणून काम करतो.

आर्द्रता असूनही ढग का तयार होत नाहीये?

साधारणपणे, ईस्टरली जेटमुळे हवा वरच्या दिशेने ढकलली जाते आणि उपखंडात मोठ्या प्रमाणावर गडगडाटासह ढग आणि पाऊस तयार होतो. नेहमीपेक्षा जास्त शक्तिशाली असलेल्या वेस्टर्ली वाऱ्यांमुळे ही प्रक्रिया दाबली जात आहे. परिणामी, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात भरपूर आर्द्रता असूनही, ढग तयार होण्यास आणि पाऊस पडण्यास पोषक परिस्थिती निर्माण होत नाहीये.

या सगळ्या वातावरणीय बदलांचा परिणाम म्हणून मान्सून नकाशावर पुढे सरकला असला तरी मोठ्या भागांत समाधानकारक पाऊस पाडण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत आहे. हवामान तज्ज्ञ या सद्य स्थितीचे वर्णन समुद्राच्या परिस्थितीमुळे नव्हे, तर उच्च-वातावरणीय घडामोडींमुळे लागलेला एक तात्पुरता पण मान्सूनमधील मोठा खंड (मान्सून पॉझ) असे करत आहेत.

मान्सूनच्या स्थितीत कधी सुधारणा होऊ शकते?
हवामानाचे मॉडेल्स सुचवतात की या आठवड्याच्या शेवटी जेट स्ट्रीमचा पॅटर्न कमकुवत झाल्यानंतर आणि मान्सूनचे चक्र पुन्हा सुरळीत झाल्यानंतर पावसाच्या स्थितीत हळूहळू सुधारणा होऊ शकते. तोपर्यंत, नैऋत्य मान्सूनच्या हंगामात सहसा पडणाऱ्या व्यापक पावसासाठी भारताच्या मोठ्या भागाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.