सांगली हादरली! पाकिस्तानचा कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात सांगली-कोल्हापूरचे तरुण; ATS कडून ७ ते ८ संशयित ताब्यात, गुप्तस्थळी मॅरेथॉन चौकशी सुरू!
सांगली :-शांत आणि संयमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. थेट पाकिस्तानमधून चालणाऱ्या एका मोठ्या नेटवर्कचे धागेदोरे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पोहोचल्याचे उघड झाले असून, यामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. पाकिस्तानचा कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात सांगली आणि कोल्हापूरमधील तरुण असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अत्यंत गोपनीय आणि मोठी कारवाई केली आहे.
सोशल मीडियावरून पाकिस्तानी कनेक्शन; 'एटीएस'ची
एकाच वेळी छापेमारी!
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील जत, विटा आणि कवठेमहांकाळ तसेच शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ७ ते ८ तरुणांना एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हे तरुण सोशल मीडियाच्या (इंस्टाग्राम/फेसबुक किंवा एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्स) माध्यमातून थेट पाकिस्तानच्या शहजाद भट्टी गँगस्टरच्या संपर्कात होते.
या तरुणांच्या संशयास्पद हालचालींवर गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि एटीएसची बारीक नजर होती. तांत्रिक विश्लेषण आणि खात्रीशिर पुरावे हाती लागताच, एटीएसच्या विशेष पथकाने रात्रीच्या अंधारात सांगली आणि कोल्हापूरच्या विविध भागात छापे टाकून या तरुणांना उचलले आहे.
मोठा घातपात घडवण्याचा डाव? 'त्या' रात्री नेमकं काय शिजत होतं?
या कारवाईनंतर संपूर्ण यंत्रणा हायअर्ट मोडवर आली आहे. ताब्यात घेतलेल्या या तरुणांना घेऊन एटीएसचे पथक एका अज्ञात स्थळी रवाना झाले असून, तिथे त्यांची कसून आणि मॅरेथॉन चौकशी सुरू आहे.
सर्वात मोठा प्रश्न: या तरुणांच्या माध्यमातून सांगली, कोल्हापूर किंवा महाराष्ट्रात एखादी मोठी दहशतवादी कृत्य, टोळीयुद्ध किंवा घातपात घडवण्याचा डाव होता का? की पाकिस्तानातून त्यांना काही मोठी रसद किंवा शस्त्रास्त्रे पुरवली जाणार होती? या गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एटीएसचे अधिकारी या तरुणांना रात्रीचा दिवस करून बोलते करत आहेत.
यंत्रणा सतर्क; जिल्ह्यात खळबळ
पाकिस्तानचा कुख्यात गँगस्टर थेट सांगलीच्या ग्रामीण भागातील (जत, विटा, कवठेमहांकाळ) तरुणांना आपल्या जाळ्यात ओढतो, ही बाब अत्यंत चिंताजनक आणि गंभीर मानली जात आहे. सोशल मीडियाचा वापर करून देशाच्या अंतर्गत सुरक्षेला सुरुंग लावण्याचा हा प्रयत्न आहे का, याचाही तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासन आणि एटीएसचे पथक कमालीचे सतर्क झाले आहे. या चौकशीतून लवकरच एखादा मोठा आणि धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.