🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेतकरी + विद्यार्थी + Gen-Z = केंद्र सरकारविरुद्ध मोठा एल्गार! राकेश टिकैत आणि CJP नेत्यांच्या बैठकीत रणनीती ठरली!

शेतकरी + विद्यार्थी + Gen-Z = केंद्र सरकारविरुद्ध मोठा एल्गार! राकेश टिकैत आणि CJP नेत्यांच्या बैठकीत रणनीती ठरली!


कॉकरोच जनता पार्टी आणि भारतीय किसान युनियन यांच्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. CJP चे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि पक्षातील इतर नेत्यांनी दिल्लीमध्ये भारतीय किसान युनियनचे ज्येष्ठ नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. या बैठकीत शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांना एकत्र आणून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली. 
बैठकीनंतर आशुतोष रांका यांनी सांगितले की, शेतकरी, विद्यार्थी आणि युवकांनी एकत्र येऊन विविध जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची गरज आहे. आगामी काळात या सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचे संकेत

अलीकडेच विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित झाल्यानंतर CJP आता शिक्षणापुरते मर्यादित न राहता शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांनाही आंदोलनात स्थान देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत. शिक्षण, रोजगार, शेती आणि इतर सामाजिक प्रश्नांवर संयुक्त भूमिका घेण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारवर आश्वासने न पाळल्याचा आरोप
CJP ने केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारांवर आंदोलनादरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप केला आहे. पक्षाच्या म्हणण्यानुसार, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काही विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी राजस्थानसह काही राज्यांमध्ये विद्यार्थ्यांविरोधातील गुन्हे अद्याप कायम आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राकेश टिकैत यांच्याकडे पाठिंब्याची मागणी

याच मुद्द्यांवर CJP ने राकेश टिकैत यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत, तर शेतकरी संघटना आणि युवकांच्या सहकार्याने देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.

विशेष म्हणजे, जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनादरम्यानही राकेश टिकैत यांनी अनेक वेळा आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे ही बैठक दोन्ही संघटनांमधील सहकार्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

राजस्थानमध्ये महापंचायतीची घोषणा
दरम्यान, भारतीय किसान युनियनने (टिकैत गट) राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील सरिस्का परिसर आणि आसपासच्या 186 गावांतील शेतकऱ्यांची 30 जुलै रोजी महापंचायत आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
नवीन आंदोलनाची शक्यता

प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करारासह विविध प्रश्नांवर शेतकरी संघटना आधीपासूनच आक्रमक भूमिका घेत आहेत. यापूर्वी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी महापंचायतीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी रवाना झाले होते.

'आश्वासने पूर्ण झाली नाहीत तर पुन्हा आंदोलन'
आशुतोष रांका यांनी सरकारवर टीका करत 25 जुलै रोजी झालेल्या चर्चेत दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नसल्याचा आरोप केला. त्यांनी सरकारने झालेल्या कराराची लेखी प्रत द्यावी, विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत आणि भविष्यात नवीन गुन्हे दाखल होणार नाहीत याची हमी द्यावी, अशी मागणी केली. या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा व्यापक आंदोलन सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.