🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

समुद्र वेगाने मागे सरकतोय की गिळतोय? मुंबई-कोलकात्यातील १.४ कोटी लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार!

समुद्र वेगाने मागे सरकतोय की गिळतोय? मुंबई-कोलकात्यातील १.४ कोटी लोकांच्या डोक्यावर टांगती तलवार!


समुद्राच्या पाणी पातळीत वाढ : भारतातील मुंबई आणि कोलकाता ही दोन मोठी शहरं समुद्र किनाऱ्यांवर वसलेली आहेत. आता या दोन्ही शहरांसाठी समुद्रच एक मोठी आपत्ती ठरू शकते. संयुक्त राष्ट्रसंघाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

समुद्राची पातळी सातत्याने वाढत आहे. यामुळे किनारपट्टीवर पाणी शिरण्याच्या धोका निर्माण झाला आहे. भारतातील कोलकाता-मुंबई आणि बांगलादेशातील ढाका यांसारख्या शहरांमधील 1.4 कोटी लोकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे.

समुद्राकडून मोठा धोका

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी या अहवालाचे विश्लेशन केले आहे. वाढत्या समुद्र पातळीचा कोलकाता आणि मुंबईत राहणाऱ्या लाखो लोकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. हा वाढणारा समुद्री त्यांची घरे गिळंकृत करु शकतो. सोमवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात, जागतिक तापमानवाढीमुळे वाढणाऱ्या समुद्राच्या पातळीच्या परिणामांबद्दल अनेक गंभीर इशारे देण्यात आले आहेत.

जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या आणि बर्फाचे थर वितळत आहेत. समुद्राचे पाणी गरम होत आहे. ज्यामुळे मालमत्ता, लोक आणि संस्कृतींवरही परिणाम होतो. 55 व्या पॅसिफिक आयलंड्स फोरम लीडर्स मीटिंगमध्ये महासचिव अमिना मोहम्मद यांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसारध्ये समुद्राच्या पातळीतील वार्षिक वाढ सुमारे सहा मिलिमीटर इतकी असून जी आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे. प्रशांत महासागरातील एक बेट राष्ट्र असलेल्या पलाऊद्वारे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. वाढत्या समुद्र पातळीमुळे या देशाची अनेक बेटे मोठ्या प्रमाणात पाण्याखाली जाऊ शकतात, ज्यामुळे हा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
पाण्याची पातळी वाढण्याचा वेग वाढला

अहवालानुसार, 2014 ते 2023 दरम्यान, जागतिक समुद्राची पातळी दरवर्षी सरासरी 4.7 मिलिमीटरने वाढली आहे. 2024 मध्येच पाणी पातळी 5.9 मिलिमीटरने वाढली. हा एक नवीन विक्रम आहे. प्रामुख्याने समुद्राच्या तापमानात झालेल्या अभूतपूर्व वाढीमुळे आहे. काही भागांमध्ये, समुद्राचे तापमान गेल्या 4,000 वर्षांतील कोणत्याही काळापेक्षा अधिक वेगाने वाढत आहे.

अमेरिका आणि चीनचे लाखो डॉलर्सचे नुकसान
वाढत्या समुद्र पातळीचा परिणाम प्रदेशानुसार मोठ्या प्रमाणात बदलतो. अमेरिकेतील मियामी आणि न्यूयॉर्क तसेच चीनमधील ग्वांगझू यांसारख्या उच्च-उत्पन्न असलेल्या शहरांमध्ये, किनारी पायाभूत सुविधांना असलेला मोठा आर्थिक धोका ही मुख्य चिंतेची बाब आहे. धोक्यात असलेल्या संसाधनांचे मूल्य 2 ते 3.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या दरम्यान असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
झोप उडवणारा अहवाल

संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी प्रसिद्ध केलेला अहवाल झोप उडवणार आहे. समुद्राची वाढती पातळी हा आता भविष्यातील धोका राहिलेला नसून एक गंभीर समस्या बनली आहे. नोंदवलेल्या इतिहासातील कोणत्याही काळापेक्षा ही पातळी अधिक वेगाने वाढत आहे. समुद्राच्या पातळीतील ही जलद वाढ प्रामुख्याने वितळणाऱ्या हिमनद्या आणि उष्ण होत असलेल्या समुद्राच्या पाण्याच्या प्रसरणामुळे होत आहे. या दोन्ही प्रक्रिया मानवी कृतींमुळे होणाऱ्या जागतिक तापमानवाढीचा थेट परिणाम आहेत.

आरोग्यावर होणारे परिणाम
अहवालानुसार, वाढत्या समुद्र पातळीमुळे शहरांची पायाभूत सुविधा, जलप्रणाली, वाहतूक जाळे, ऊर्जा जाळे, इमारती आणि भूजल संसाधनांवर आधीच परिणाम होत आहे.
पिण्याच्या पाण्याचे संकट

सर्वात मोठे परिणाम दक्षिण आशियातील सखल त्रिभुज प्रदेशात आणि भारतातील कोलकाता व मुंबई आणि बांगलादेशातील ढाका यांसारख्या शहरांमध्ये लोकांच्या विस्थापनाच्या स्वरूपात दिसून येत आहेत. येथे 14 कोटीहून अधिक लोकांची घरे कायमची समद्रात बुडू शकतात. ही गंभीर परिस्थिती उद्भवण्यासाठी अहवालात कोणतीही विशिष्ट कालमर्यादा दिलेली नाही.

वाढत्या समुद्र पातळीमुळे एक आव्हान निर्माण झाले आहे, कारण त्या भागातील लोक आपली किनारपट्टीची जमीन गमावू शकतात. वाढत्या समुद्र पातळीचा परिणाम केवळ किनारपट्टीच्या भागांपुरता मर्यादित नाही. कारण त्याचा परिणाम आरोग्य, अन्न सुरक्षा, मानवाधिकार आणि संस्कृतीवर होऊ शकतो.

वितळणाऱ्या हिमनद्यापासून मोठा धोका
नेपाळ-तिबेट सीमेवर हिमालयातून एक हिमनदी तुटून कोसळली, त्यामुळे पाणी आणि चिखलाची त्सुनामी उसळली, ज्यात शेकडो लोकांचा बळी गेला आहे. अनेक भागांचे मोठे नुकसान झाले. हिमालयातील हिमनद्यांना 'तिसरा ध्रुव' मानले जाते. "आपल्याकडे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहेत, आणि दक्षिण आशियाला 'तिसरा ध्रुव' मानले जाते कारण येथे जगातील हिमनद्या मोठ्या प्रमाणात एकवटलेल्या आहेत. पुढील 15 ते 20 वर्षांत, हिमनद्या वितळल्यामुळे दक्षिण आशियाला पुराचा धोका आहे. यानंतर दुष्काळ पडू शकतो, ज्यामुळे पिकांवर आणि अन्नसुरक्षेवर परिणाम होऊन मोठे धोके निर्माण होऊ शकतात." जगभरातील सुमारे 77 कोटी लोक, म्हणजेच पृथ्वीवरील प्रत्येक दहा लोकांपैकी जवळपास एक जण, भरतीच्या रेषेपासून पाच मीटरपेक्षा कमी उंचीवर असलेल्या किनारपट्टीच्या भागात राहतात. यामुळे आधीच मोठ्या धोक्यांचा सामना करत असल्यामुळे धोक्यात आहेत.

जगभरात समुद्राची पातळी वाढल्यामुळे किमान 1.8 ट्रिलियन डॉलर्स किमतीच्या पायाभूत सुविधा धोक्यात असल्याचा अंदाज आहेत. समुद्र पातळी वाढल्यास शहरी पायाभूत सुविधा, जलप्रणाली, वाहतूक, ऊर्जा जाळे, इमारती आणि भूजल संसाधनांचे आधीच नुकसान होत आहे. याचे दूरगामी परिणाम होत असून, ते दीर्घकाळात मानवाधिकारांच्या प्रभावी उपभोगाला धोका निर्माण होऊ शकतो असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेतील मियामी आणि न्यूयॉर्क आणि चीनमधील ग्वांगझोऊ यांसारख्या उच्च-उत्पन्न असलेल्या शहरांमध्ये, मुख्य परिणाम म्हणजे किनारी पायाभूत सुविधांना असलेला मोठा आर्थिक धोका, ज्यामध्ये धोक्यात आलेल्या मालमत्तेचे अंदाजित मूल्य 2 ट्रिलियन ते 3.5 ट्रिलियन डॉलर्सच्या दरम्यान आहे," असे अहवालात म्हटले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.