दिल्लीमध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या उपसंचालकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. चिंतन रघुवंशी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सीबीआयने ही कारवाई केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने दिलेल्या
माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालयचे उपसंचालक चिंतन रघुवंशी यांनी
भुवनेश्वर येथील खाण उद्योजकाकडून 5 कोटींची लाच मागितली होती आणि 2
कोटींवर व्यवहार ठरला होता. हवाला प्रकरण सेटल करण्यासाठी ही लाच मागण्यात
आली होती. यापैकी 20 लाख रुपये घेताना रघुवंशी यांना सीबीआयने रंगेहाथ
पकडले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर लगेचच अटक
करण्यात आली.
चिंतन रघुवंशी हे 2013 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. ओडिशामध्ये गेलेल्या तपास पथकामध्येही त्यांचा समावेश होता. त्यांनी भुवनेश्वर येथील एका उद्योजकाकडे लाच मागितल्याची विश्वासार्ह माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानंतर सीबीआयने त्यांच्यावर नजर ठेवली आणि लाच स्वीकारताना अटक केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.