मानव एकता दिवसानिमित्त सांगली येथील रक्तदान शिबीरात 290 जणांचा उत्फुर्त सहाभाग
सांगली:- करूणा ,प्रेम आणि सह-अस्तित्वाचा प्रेरणादायी उत्सव -२४एप्रिल मानव एकता दिवस .हृदयात करुणा, प्रेम आणि एकात्मतेची दिव्य जाणीव जागृत झाली की, मनुष्य आपल्या संकुचित स्वार्थांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम बनतो. परोपकार, करुणा आणि परमार्थ या उदात्त मूल्यांनी अधोरेखित झालेला हा दिवस उच्च मानवी मूल्यांची जाणीव अधोरेखित करणारा ठरला; ‘मानवाने मानवावर प्रेम करावे, एकमेकांचे आधार बनावे’ हा संदेश शब्दांच्या पलीकडे जाऊन जनमानसात ठळकपणे रुजला.
‘मानव एकता दिवस’ २४ एप्रिल रोजी युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या सान्निध्यात, दिल्लीतील ग्राउंड क्र. ८ येथे अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. याचबरोबर देशभरातील हजारो सत्संग केंद्रांवरही हा दिवस श्रद्धा व समर्पणभावाने यशस्वीरीत्या पार पडला.
युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृतीत साजरा होणारा हा दिवस वर्षभर चालणाऱ्या सेवा उपक्रमांचा प्रारंभबिंदू आहे. या अंतर्गत देशभरात सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जाणार असून, करुणा आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प यामागे आहे.
रक्तदानाची ही पावन परंपरा मागील चार दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत ९,१७४ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५,००,२३० युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मानवसेवेप्रती निरंकारी मिशनची अटळ बांधिलकी यामुळे अधोरेखित होते.
मानव एकता दिवसानिमित्त सांगली सेक्टरच्या मार्फत ,संत निरंकारी भवन कोल्हापूर रोड, सांगली.येथे आयोजित रक्तदान शिबिरात 290 जणांनी उत्फुर्त प्रतिसाद नोंदवला पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयांतील अनुभवी डॉक्टर निलेश पाटील,रक्त संकलन अधिकारी सांगली.व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित, सुव्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. या रक्तदान शिबीरामध्ये सांगली सेक्टर अंतर्गत,सांगली,मिरज,नरवाड,देशिंग,सलगरे, कवठेमहांकाळ व जत याही ब्रॅंचेस सहभागी होत्या.शिबिराचे उद्घाटन सन्मानीय सतिश जी कदम , उपजिल्हाधिकारी,सांगली .यांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यानी सदर उपक्रमाचे ," सामाजिक मानवी सेवेच्या जाणिव जपणारा उपक्रम "अशा शब्दांत गौरव केला.संपूर्ण आयोजनात स्वच्छता, सतर्कता आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम केवळ जीवनदायी सेवापुरता मर्यादित न राहता मानवता,करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे उच्च प्रतीक म्हणून समोर आला.
सायंकाळी,प.पु.विरेंद्र बामणे जी , प्रचारक,मुंबई.यांच्या उपस्थित,भव्य सत्संग सोहळा संपन्न झाला.सदर , रक्तदान शिबीर व सत्संगाचे नियोजन,प.आ.नंदकुमार झांबरेजी झोनल इन्चार्ज सातारा,प.आ.जालिंदर जाधव जी,सेक्टर संयोजक, सांगली व सेवादल अधिकारी.यांचे मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.
युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवनाचा अवलंब करण्याचे आणि आपली ऊर्जा समाजसेवेसाठी वापरण्याचे आवाहन केले. बाबा हरदेव सिंह जी यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा संदेश देत सेवेला जीवनाचा अविभाज्य घटक बनवले. हाच सेवा-संदेश सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजही प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.