Big Breaking! जतमध्ये निसर्गाचे तांडव: काळजाचा थरकाप उडवणारी घटना, ९ महिन्यांच्या चिमुरड्याचा करुण अंत
जत (सांगली): जत तालुक्यातील खलाटी गावात गुरुवारी आलेल्या भीषण वादळी वाऱ्याने आणि पावसाने संपूर्ण गावाला हादरवून सोडले आहे. निसर्गाच्या या प्रकोपात एका ९ महिन्यांच्या निष्पाप बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
खलाटी येथील रहिवासी आनंदा शेजूळे यांच्या कुटुंबावर निसर्गाने भीषण घाला घातला. सायंकाळच्या सुमारास अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, शेजूळे यांच्या घरावरील पत्रे पत्त्यासारखे उडून गेले. मात्र, खरी धक्कादायक घटना पुढे घडली. घरात पाळण्यात शांतपणे झोपलेले ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले.वाऱ्याच्या वेगाने हे बाळ पाळण्यासह घरापासून लांब फेकले गेले. दुर्दैवाने, पाळण्यातून खाली पडल्यामुळे या चिमुरड्याचा जागीच मृत्यू झाला. काही कळण्याच्या आतच नियतीने एका हसत्या-खेळत्या कुटुंबातील दिवा विझवला.
गावावर शोककळा
घरातील छप्पर उडाले आणि डोळ्यादेखत पोटचा गोळा काळाने हिरावून नेल्याने शेजूळे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची माहिती मिळताच खलाटी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, निसर्गाचे हे रूप इतके भयानक असू शकते, या कल्पनेनेच सर्वजण सुन्न झाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.